शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

साने गुरुजींच्या कर्मभूमीत रंगणार ९७ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 06:20 IST

अमळनेरच्या नावावर बैठकीत शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर, (जि. जळगाव) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे गठित करण्यात आलेल्या स्थळ निवड समितीतर्फे २३ रोजी सर्वानुमते मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि साने गुरुजींच्या कर्मभूमीत संमेलन घेण्यास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मान्यता दिली. 

पुण्यात आज झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत अमळनेरचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, प्रकाश पागे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जे.जे. कुलकर्णी, दादा गोरे, डाॅ. विद्या देवधर, अ.के. आकर, प्रकाश गर्गे, दगडू लोमटे आदींची उपस्थिती होती. या संमेलनासाठी खान्देशातील अमळनेर, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (सांगली), तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातूनही प्रस्ताव होता. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनीताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक यांच्या समितीने अमळनेर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती.खान्देशातील यापूर्वीची संमेलने वर्ष    क्रमांक    स्थळ १९३६    २२    जळगाव    १९४४    २९    धुळे १९५२    ३५    अमळनेर    १९८४    ५८    जळगाव

साने गुरुजींच्या कर्मभूमीत, संत सखाराम महाराजांच्या पुण्यभूमीत आणि श्रीमंत प्रताप शेठजी व अझीम प्रेमजी यांच्या उद्योगभूमीत ९७ वे साहित्य संमेलन होणार आहे. ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. संमेलन यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी साऱ्या अमळनेरकरांनी घेतली, ही आनंदाची बाब आहे.     डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष, म.वा.     मंडळ, अमळनेर, जि. जळगाव.

तिन्ही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळनिवड समितीने सर्वांनुमते अमळनेरची शिफारस केली. महामंडळाने त्याला मान्यता दिली.    -उज्ज्वला मेहेंदळे, कार्यवाह, अखिल     भारतीय मराठी साहित्य महामंडळ

७१ वर्षांनी अमळनेरमध्ये संमेलनn यापूर्वी अमळनेर येथे १९५२ मध्ये संमेलन भरले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष कृ.पां. कुलकर्णी होते. n त्यामुळे तब्बल ७१ वर्षांनंतर पुन्हा अमळनेरला संमेलन घेण्याची संधी मिळाली आहे. गेल्या चार- पाच वर्षांपासून तेथून प्रस्ताव येत होता. n नियोजन क्षमता पाहून त्यांची निवड करण्यात आली. ‘लोकमत’ने अमळनेरला संमेलन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तो खरा ठरला.

टॅग्स :Jalgaonजळगावakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळSane Gurujiसाने गुरुजी