शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट, मुक्कामी गाड्याही ९० टक्के सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST

इन्फो: ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांना ५० टक्केच प्रतिसाद महामंडळाने ग्रामीण भागातील सर्व मार्गांवर दिवसा बससेवा सुरू केली असून, रात्रीच्या ...

इन्फो:

ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांना ५० टक्केच प्रतिसाद

महामंडळाने ग्रामीण भागातील सर्व मार्गांवर दिवसा बससेवा सुरू केली असून, रात्रीच्या मुक्कामी बसेसही सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे प्रवाशांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद नाही. सध्या ५० टक्केच प्रवाशांचा प्रतिसाद असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले, तर बाजाराच्या दिवशी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे, त्या दिवशी बसेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

-जळगाव आगारातर्फे नाशिक, औरंगाबाद, धुळे, पुणे या शहरी मार्गावर वेळापत्रकाप्रमाणे बसेस सोडण्यात येत असून, या सर्व मार्गांवर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.

- सध्या रेल्वे गाड्यांना जनरल तिकीट बंद असून, त्यात तिकीट आरक्षणही होत नसल्यामुळे नाशिक, औरंगाबाद, पुणे या मार्गावर जाणारे प्रवासी बसकडे वळत आहेत. त्यामुळेही या मार्गावरच्या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.

- तसेच महामंडळातर्फे शहरी मार्गांवर धावणाऱ्या बसेसलाही ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

जळगाव आगारातर्फे शहरी भागासह ग्रामीण भागातील ९० टक्के गावांना मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली आहे. तसेच सध्या नाशिक, औरंगाबाद, पुणे या मार्गांवर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा बसेस सोडण्यात येत आहेत.

नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार

इन्फो :

मुक्कामी जाणाऱ्या १६ गावांना बससेवा सुरू

जळगाव आगारातून गेल्या आठवड्यापासून मुक्कामी जाणाऱ्या चोपडा, शिरपूर, नंदगाव, रंवजा, दहिगाव, खेडी-कढोली, नांदेड, चाळीसगाव या गावांना मुक्कामी बससेवा नियमित सुरू केल्या आहेत. रात्री वेळापत्रकाप्रमाणे मुक्कामासाठी वेळापत्रकाप्रमाणे जळगाव आगारातून या बसेस निघत आहेत.

इन्फो :

मुक्कामी गाडी येत असल्याने त्रास वाचला

कोरोनामुळे पूर्वी गाडी मुक्कामी येत नसल्यामुळे सकाळी जळगावला येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. खासगी वाहनांनी जादा पैसे मोजून जळगावला यावे लागायचे. आता अनलॉकनंतर गावात मुक्कामी बस येऊ लागल्याने नागरिकांचा त्रास वाचला आहे. यापुढेही मुक्कामी बससेवा सुरू ठेवणे महामंडळाने गरजेचे आहे.

दिलीप पाटील, प्रवासी

ग्रामीण भागात आजही अनेक नागरिक एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यात विशेषत: शहरात येण्यासाठी रात्री मुक्कामी येणाऱ्या बसेसला प्राधान्य देतात. कोरोना काळत मुक्कामी बससेवा बंद असल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत होता. आता मात्र जळगाव आगारातर्फे मुक्कामी बससेवा नियमित झाल्याने गैरसोय टळली आहे.

संजय देसले, प्रवासी