शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट, मुक्कामी गाड्याही ९० टक्के सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST

इन्फो: ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांना ५० टक्केच प्रतिसाद महामंडळाने ग्रामीण भागातील सर्व मार्गांवर दिवसा बससेवा सुरू केली असून, रात्रीच्या ...

इन्फो:

ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांना ५० टक्केच प्रतिसाद

महामंडळाने ग्रामीण भागातील सर्व मार्गांवर दिवसा बससेवा सुरू केली असून, रात्रीच्या मुक्कामी बसेसही सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे प्रवाशांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद नाही. सध्या ५० टक्केच प्रवाशांचा प्रतिसाद असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले, तर बाजाराच्या दिवशी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे, त्या दिवशी बसेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

-जळगाव आगारातर्फे नाशिक, औरंगाबाद, धुळे, पुणे या शहरी मार्गावर वेळापत्रकाप्रमाणे बसेस सोडण्यात येत असून, या सर्व मार्गांवर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.

- सध्या रेल्वे गाड्यांना जनरल तिकीट बंद असून, त्यात तिकीट आरक्षणही होत नसल्यामुळे नाशिक, औरंगाबाद, पुणे या मार्गावर जाणारे प्रवासी बसकडे वळत आहेत. त्यामुळेही या मार्गावरच्या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.

- तसेच महामंडळातर्फे शहरी मार्गांवर धावणाऱ्या बसेसलाही ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

जळगाव आगारातर्फे शहरी भागासह ग्रामीण भागातील ९० टक्के गावांना मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली आहे. तसेच सध्या नाशिक, औरंगाबाद, पुणे या मार्गांवर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा बसेस सोडण्यात येत आहेत.

नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार

इन्फो :

मुक्कामी जाणाऱ्या १६ गावांना बससेवा सुरू

जळगाव आगारातून गेल्या आठवड्यापासून मुक्कामी जाणाऱ्या चोपडा, शिरपूर, नंदगाव, रंवजा, दहिगाव, खेडी-कढोली, नांदेड, चाळीसगाव या गावांना मुक्कामी बससेवा नियमित सुरू केल्या आहेत. रात्री वेळापत्रकाप्रमाणे मुक्कामासाठी वेळापत्रकाप्रमाणे जळगाव आगारातून या बसेस निघत आहेत.

इन्फो :

मुक्कामी गाडी येत असल्याने त्रास वाचला

कोरोनामुळे पूर्वी गाडी मुक्कामी येत नसल्यामुळे सकाळी जळगावला येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. खासगी वाहनांनी जादा पैसे मोजून जळगावला यावे लागायचे. आता अनलॉकनंतर गावात मुक्कामी बस येऊ लागल्याने नागरिकांचा त्रास वाचला आहे. यापुढेही मुक्कामी बससेवा सुरू ठेवणे महामंडळाने गरजेचे आहे.

दिलीप पाटील, प्रवासी

ग्रामीण भागात आजही अनेक नागरिक एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यात विशेषत: शहरात येण्यासाठी रात्री मुक्कामी येणाऱ्या बसेसला प्राधान्य देतात. कोरोना काळत मुक्कामी बससेवा बंद असल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत होता. आता मात्र जळगाव आगारातर्फे मुक्कामी बससेवा नियमित झाल्याने गैरसोय टळली आहे.

संजय देसले, प्रवासी