शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

९३ पाणीपुरवठा योजनांचा खंडित वीजपुरवठा होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 5:42 PM

चाळीसगाव येथे जनता दरबारात वीज बिलांबाबत तक्रारी

ठळक मुद्दे वैयक्तिक वीजबिलांचा गोंधळ, अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी याबाबतही नागरिकांनी जनता दरबारात समस्या माडल्या. यावर नरेंद्र सोनवणे यांनी अशा साडेतीन हजार तक्रारी आल्याचे मान्य कैले. याचा निपटारा येत्या ३० दिवसात पूर्ण करण्याच्या सूचनाही आमदार पाटील यांनी दि ‘लोकमत’ने तालुक्यातील वीलबिले वसुली व वीजपुरवठा करण्याच्या मोहिमेचे विस्तृत वृत्त १३ फेब्रुवारीच्या अंकात मांडले होते. या समस्येचा उहापोह केला होता. जनता दरबारात काही सरपंचांनी ‘लोकमत’ने प्रश्न मांडल्याबद्दल धन्यवाद दिले. वीजपुरवठा खंडित केल्याने गाव कारभाºयांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि. १६ : तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि सार्वजनिक विज देयके थकविल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचे धोरण अबलंबिल्याने याचे तीव्र पडसाद उमटले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता आमदारांनी बोलविलेल्या जनता दरबारात सरपंचांनी वीजबिलांबाबत तक्रारी करतानाच महावितरणच्या वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेवरही आगपाखड केली. यावर आमदार पाटील यांनी तोडगा काढल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे महावितरणने मान्य केले आहे. या वेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, दिनेश बोरसे, आनंद खरात, महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र सोनवणे, शंकर भालसिंग आदी उपस्थित होते.महावितरणने १०० टक्के वीजबिले वसुली मोहिमेतर्गत सूचना देऊनही वीज बील न भरणाºया ग्रामीण भागातील १९२ पैकी ९३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला होता. ३४ ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक वीजबिलांची नऊ कोटी ४० लाख ५२ हजार रुपये थकविल्याने त्याचाही वीजपुरवठा खंडित करून झटका दिला होता. पाणी योजनांकडे सहा कोटी ४० लाख ४० हजार असे एकूण १६ कोटी रुपये वसुलीसाठी महावितरणने १ फेब्रुवारीपासून वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. याआधी ग्रामपंचायतींना थकबाकी भरण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. महावितरणाला थकीत रकमेतील ५० टक्के रक्कम मिळणे अपेक्षित आहे.१० दिवसात पैसे भरणारवीजपुरवठा खंडित झाल्याने गावे अंधारात असून पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. गिरणेला मध्यंतरी आवर्तन सुटल्याने पाणी असूनही विजेअभावी पाणीपुरवठा होऊ शकत नाही. यामुळे ग्रामीण भागात मोठा असंतोष पसरला आहे. याची दखल घेत शुक्रवारी आमदार उन्मेष पाटील यांनी सरपंचांचे म्हणणे ऐकून घेतले.जानेवारीच्या वीज बिलाच्या रकमेपोटी ग्रामपंचायतींनी १६ रोजी त्यांच्याकडे जेवढी रक्कम उपलब्ध होईल त्याचा भरणा महावितरणकडे करावयाचा आहे.शुक्रवारी सायंकाळपर्यंत सर्व पाणी योजना व गावांचा सार्वजनिक वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार अशा सूचना आमदार पाटील यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र सोनवणे यांना दिल्या.वीज बिलाची उरलेली रक्कम ग्रामपंचायतींनी १० दिवसात अदा करावयाची आहे, असा तोडगा काढण्यात आला असून, वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याबाबत आमदार पाटील यांनी सक्त सूचना दिल्या.थकबाकीचे टप्पे पाडणारसद्य:स्थितीत ग्रामपंचायतींची आर्थिकस्थिती खालावलेली आहे. खरीप व रब्बी हंगामात शेतकºयांना फारसे काही मिळाले नाही. याचा फटका ग्रामपंचायतींच्या वसुलीला बसला आहे. ग्रा.पं. चे कर संकलन (घरपट्टी, पाणीपट्टी) पूर्णपणे ठप्प आहे. वीजबिलाची थकीत रक्कम टप्पे पाडून अदा करावे, असा मार्ग काढण्यात आला. थकबाकीनुसार पाच, १० आणि १५ हप्त्यांचे टप्पे पाडण्यात आले. ही सूचना सरपंचांनी मान्य केली. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज बिलांची थकीत रक्कम अदा करता येईल का? याबाबत ग्रामविकास विभागाकडून मार्गदर्शनही घेण्यात येणार आहे. वीज बील १० दिवसात भरण्याबाबत हमीपत्रेही भरून घेण्यात येणार आहे. 

टॅग्स :Waterपाणी