शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

मुक्ताईनगर तालुक्यातील ८५१ शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 2:51 PM

८५१ शेतकरी डिमांड नोटची रक्कम भरूनही कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत.

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील ८५१ शेतकरी डिमांड नोटची रक्कम भरूनही कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत. निसर्गाच्या अनियमिततेमुळे होणारे नुकसान टाळण्यासह रब्बी हंगामात सिंचन करून आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, परंतु महावितरणकडून अद्याप कृषीपंप जोडणीच मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचा या वर्षाचाही रब्बी हंगामही हातून जाणार आहे.शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमिततेचा फटका वारंवार बसतो. अनेकदा अवर्षणामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होते, तर रब्बी हंगामातही पाणी उपलब्ध असताना वापर करण्यास साधने नसल्याने शेतकऱ्याना स्वत:चा आर्थिक विकास साधणे शक्य होत नाही. असे अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन विहिरी घेऊन किंवा जिल्ह्यातील जलस्त्रोतांच्या आधारे सिंचन करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महावितरणकडे अर्ज करीत आहेत. अडीच वर्षांच्या काळात ८५१ शेतकऱ्यांनी असे अर्ज केले. महावितरणकडून त्यांना डिमांड नोटही मिळाली. या शेतकऱ्यांनी डिमांड नोटचे पैसे भरूनही त्यांना अद्याप वीज जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना यंदाही रब्बी हंगामापासून वंचित राहावे लागणार आहे.वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या या ८५१ शेतकऱ्यांना प्रत्येकी स्वतंत्र रोहित्र देण्यात येणार आहे. जेथे सोईस्कर राहील तेथे एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांना अधिक क्षमतेच्या एकाच रोहित्रावरून जोडणी दिली जाणार आहे. या सर्व प्रतीक्षेतील शेतकऱ्यांच्या वीज जोडणीकरिता सांबांधित मक्तेदारांना कामे देण्यात आली आहे. जवळपास सर्व ठिकाणी कामे सुरू आहेत.८५१ शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीजजोडणीसाठी मक्तेदारांना काम देण्यात आले आहे. जवळपास ९० टक्के ठिकाणावर कमी अधिक प्रमाणात खांब टाकणे, तारा ओढणे रोहित्र बसवणे अशी कामे सुरू आहेत.-ज्ञानेश्वर ढोले, उपकार्यकारी अभियंता, मुक्ताईनगर 

टॅग्स :FarmerशेतकरीMuktainagarमुक्ताईनगर