८ कोटी ९२ लाख ८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST2021-08-17T04:22:28+5:302021-08-17T04:22:28+5:30
जळगाव जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून एकूण ४३ हजार ३५७ नोंदीत ...

८ कोटी ९२ लाख ८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य
जळगाव जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून एकूण ४३ हजार ३५७ नोंदीत कामगारांना ८ कोटी ९२ लाख ८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य थेट बँक खात्यात जमा केले. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत २ हजार ७२३ कामगारांना ४० लाख ८४ हजार ५०० रुपयांची मदत केली. नोंदीत १ हजार ६२८ माथाडी कामगारांना ३२ लाख ५६ हजार रुपयांची मदत केली. नोंदीत सुरक्षारक्षकांना १ हजार रुपये अतिरिक्त वाहन भत्ता मंजूर केला. एकूण ५३८ सुरक्षारक्षकांना ५ लाख ३८ हजार रुपयांची मदत केली. याबरोबरच जिल्ह्यात ४ हजार १३७ ऑटोरिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १५०० याप्रमाणे ६२ लाख ५ हजार ५०० रुपयांचे अर्थसाहाय्य संबंधितांच्या बँक खात्यात जमा केले आहे.
मजुरांच्या हाताला काम
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ८ लाख १० हजार २९५ मनुष्य दिवसांची निर्मिती करण्यात आली असून याकरिता २३ कोटी २७ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. शिवाय जिल्ह्यात खावटी योजनेंतर्गत ७० हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून आतापर्यंत ६० हजार लाभार्थ्यांना लाभाचे वाटप केले आहे. तर शासकीय आश्रमशाळांमार्फत आदिवासी विद्यार्थी, गरजू मजुरांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच नवसंजीवनी योजनेंतर्गत यावल तालुक्यातील ७ गावांना ४ महिन्यांचे धान्य पावसाळ्यापूर्वीच रवाना करण्यात आले. जिल्ह्यातील कोणीही गरीब व गरजू अन्नापासून वंचित राहू नये याकरिता जिल्ह्यात ४७ शिवभोजन केंद्रांमार्फत दररोज ४ हजार ५०० थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे, अशीही माहिती कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आली.