शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

७८ जवान आणणार वाळूमाफियांवर संक्रांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 18:51 IST

घाटांच्या सुरक्षेसाठी होणार तैनात : महामंडळाचे अधिकाऱ्यांशी आज चर्चा.

कुंदन पाटील/ जळगाव : वाळूमाफियांना ठेचण्यासाठी यापुढे तापी आणि गिरणा नदीकाठच्या डझनभर ‘हॉट स्पॉट’वर राज्य सुरक्षा महामंडळाचे सशस्त्रधारी ७८ जवान तैनात करण्यात येणार आहेत.तसा प्रस्ताव महसुल प्रशासनाने राज्य सुरक्षा महामंडळाला दिला आहे. त्यानुसार बुधवारी महामंडळाचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून संक्रांतीनंतर ‘हॉट स्पॉट’ठरलेल्या वाळू घाटांवर जवान तैनात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कुणबी-मराठा सर्व्हेक्षण, लोकसभा निवडणुक आणि दैनंदिन कामकाजामुळे मोकळ रान मिळणार, या भ्रमात असलेल्या वाळूमाफियांना यंदाची संक्रांत चांगलीच त्रासदायक ठरणार आहे. कारण दि.१५ जानेवारीनंतर आगामी अडिच महिन्यांच्या कालावधीसाठी १२ वाळूघाटांवर राज्य सुरक्षा महामंडळाचे शस्त्रधारी जवान तैनात करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. 

आज आढावा घेणारदरम्यान, यापूर्वी राज्य सुरक्षा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी  ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या वाळूघाटांची पाहणी केली आहे. जवान तैनात केल्यानंतर कारवाईची दिशा आणि माफियांना लगाम घालण्यासाठी आवश्यक ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यासाठी राज्य सुरक्षा महामंडळाचे अधिकारी बुधवारी मुंबईहून जळगावात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब होणार आहे. जवानांच्या मानधनापोटी जिल्हा प्रशासनाकरवी त्यांना आगाऊ रकम अदा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव