शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
2
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
3
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
4
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
5
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
6
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
7
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
8
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
9
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
10
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
11
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
12
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
13
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
14
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
15
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
16
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
17
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
18
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
19
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
20
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेळगाव प्रकल्पात होणार ७५ टक्के पाणीसाठा; धरण सुरक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी 

By आकाश नेवे | Updated: September 20, 2022 19:15 IST

शेळगाव प्रकल्पात होणार ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. 

जळगाव : यावल आणि जळगाव तालुक्यातील अनेक गावांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या शेळगाव बॅरेजचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे शासन नियमानुसार या मध्यम प्रकल्पात ७५ टक्के म्हणजे जवळपास ३ टीएमसी पाणीसाठा केला जाऊ शकतो. त्यासाठी धरण सुरक्षा मंडळ, नाशिक विभागाचे अधिक्षक अभियंता महेंद्र आमले यांनी मंगळवारी शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाची पूर्ण पाहणी केली आहे. तसेच तांत्रिकदृष्ट्या या प्रकल्पात पाणीसाठा करण्यास मान्यता मिळाली आहे.

शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाचे बांधकाम आणि द्वार उभारणीचे काम तसेच दार बंद करण्यासाठी आवश्यक कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षी शेळगाव बॅरेजमध्ये ७५ टक्के पाणीसाठा केला जाणार आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ४.११ टीएमसी आहे. त्याच्या ७५ टक्के म्हणजे जवळपास ३ टीएमसी पाणी या वर्षी धरणात साठवले जाणार आहे. यासाठी आज धरण सुरक्षा मंडळ नाशिक येथील अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, मंडळाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी प्रकल्प स्थळावर येऊन सर्व आवश्यक तपासणी आणि पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पात पाणीसाठा करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी प्रकल्पाचे सल्लागार पी. आर. पाटील, पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाची पाहणी केली. तसेच गेट व्यवस्थित कार्यरत आहेत की नाही याची पाहणी केली. याशिवाय पाणीसाठा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेही ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. ते मिळाल्यानंतर पाणीसाठा करणे शक्य होणार आहे.

काय आहे शेळगाव प्रकल्पाचे फायदेशेळगाव प्रकल्प हा जळगाव शहरापासून १८ किमीवर असलेल्या शेळगाव गावाजवळ आहे. या प्रकल्पाला १९९७-९८ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हा प्रकल्प आता पूर्णत्वाला आला होता. यावल तालुक्यात डार्क झोनमध्ये असणाऱ्या ९१२८ हेक्टर शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. जळगाव व भुसावळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खासगी औद्योगिक वसाहती, खासगी उद्योग समूहासाठी आवश्यक औद्योगिक वापरासाठी मुबलक पाणी व पुढील ५० वर्षांसाठी आवश्यक पाण्याचे नियोजनानुसार आवश्यक मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. भुसावळ शहर पाणीपुरवठ्यासाठी शाश्वत स्रोत आणि मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच भुसावळ रेल्वे जंक्शन आणि इतर रेल्वे वसाहतींसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावDamधरणWaterपाणी