शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

वादळी पावसामुळे रावेर तालुक्यात केळीचे ७५ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 7:09 PM

रावेर तालुक्यात गेल्या बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे २५ गावातील ९८२ शेतकऱ्यांच्या ११३७ हेक्टरवरील केळी बागांचे सुमारे ७५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका प्रशासनाने वर्तविला आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे धिम्या गतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देतालुक्यात लागोपाठ वादळाच्या तडाख्याने केळी मातीमोल९८२ शेतकºयांच्या ११३७ हेक्टरवरील केळीचे नुकसानऐन कापणीवर आलेली केळी उद्ध्वस्त

लोकमत आॅनलाईनरावेर, दि.९ : तालुक्यात वादळी पावसामुळे केळी बागांचे सुमारे ७५ कोटींचे नुकसान झाल्याचा तालुका प्रशासनाने प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम मात्र धिम्या गतीने सुरू असल्याने आपद्ग्रस्त शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तालुक्यातील अजनाड, अटवाडे, दोधे, नेहते, खिरवड, विटवे, ऐनपूर, निंभोरा,खिर्डी, दसनूर,सिंगनूर, मस्कावद, आंदलवाडी, वाघोदा, सावदा, जिन्सी, आभोडा, मोरव्हाल, मंगरूळ, मांगी-चुनवाडे, रायपूर, अजंदे, नांदूरखेडा आदी २५ गावात बुधवारी वादळी पाऊस व गारपिटीने दिलेल्या तडाख्यात ९८२ शेतकºयांची ११३७ हेक्टरमधील केळी मातीमोल झाल्याने ७५.७९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या अहवालात वर्तविला आहे.दरम्यान, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे यांनी व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बाधित क्षेत्राची नुकतीच पाहणी केली.त्या गावांचे पंचनामे अपूर्णचदरम्यान, तालुक्यातील निरूळ, पाडळे बु, पाडळे खुर्द परिसरातील १३ गावांना शुक्रवारी वादळी पावसाने तडाखा दिल्याने तेथील नुकसानीचे पंचनामे अद्यापही अपूर्ण असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पंचनामे पूर्णत्वास येतील अशी आश्वासने प्रशासनाने दिल्यानंतरही महसूल व कृषी विभागाच्या संथगतीने चाललेल्या कारभाराचा बुरखा पुन्हा फाटला.वादळामुळे सावदा, थोरगव्हाण, कोचूर शिवारातील ४१ शेतकºयांचे २३ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होवून १ कोटी ५१ लाख ८० हजार रुपयांचा नुकसानीचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी व महसूल विभाग जिल्हा प्रशासनाकडे सादर करीत नाहीत, तोच मंगळवारी सायंकाळी मध्यप्रदेशाकडून तालूक्यातील पूर्व भागातून शिरकाव करीत तापीकाठावर वादळी पावसासह गारपीटीचा तडाखा बसला. ऐन कापणीवरील केळीच्या उत्पादनाचा तोंडी आलेला घास हिरावून घेत नैसर्गिक आपत्तीमुळे अपरिमित हानी झाली. घरावरील टीनपत्र्यांचे छत उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर त्यांच्यावर संकट उभे ठाकले आहे. अजनाड येथे काहींच्या घरावर वृक्ष पडल्याने त्यांचे संसारोपयोगी वस्तू दाबल्या गेल्या. बहूतांशी ठिकाणी विजेचे खांब कोसळून व तारा तुटून पडल्याने रात्रभर गावे अंधारात होती बºहाणपूर- अंकलेश्वर राज्य महामार्गावर चोरवड येथील मध्य प्रदेशातील सीमा ते बºहाणपूर दरम्यान ३० ते ३५ झाडे उन्मळून पडल्याने तब्बल ४ तास १३ किलोमीटर अंतरापर्यंत दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.दरम्यान, गुरूवारी दुपारपर्यंत महसूल व कृषी प्रशासनाने २५ गावात वादळी पाऊस व गारपिटीने बुधवारी दिलेल्या तडाख्यात ९८२ शेतकºयांचे ११३७ हेक्टरमधील केळी मातीमोल झाल्याने ७५.७९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस