शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जळगावात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा जागीच मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 12:29 IST

चाळीसगावात झालेल्या भीषण रस्ते अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 2 जण गंभीर जखमी आहेत.

जळगाव - मुलाला दवाखान्यात नेत असताना झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. चाळीसगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर दक्षिणेला राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ वर रांजणगाव फाट्याच्या पुढे आयशर ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. मागील बाजूनं येणारे दोघे बाईकस्वारांचाही या दुहेरी अपघातात मृत्यू झाला आहे. सोमवारी उशीरा रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सातही मृत एकाच कुंटुबातील असून शहरापासून १२ किलोमीटर अंतरावरील बोढरे येथील रहिवासी होते. 

मितेश नामदेव चव्हाण (वय १७ ) याची प्रकृती बरी नसल्याने त्याची आई शिलाबाई नामदेव चव्हाण यांच्यासह मिथून रुमदेव चव्हाण (वय २५), शुभम तुकाराम चव्हाण (वय१७), गाडी चालक पंडीत बापू जाधव (वय ५५) हे सर्व गाडीनं चाळीसगावकडे येत असताना रांजगाव फाट्याच्या पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ येथे धुळेहुन औरंगाबादकडे जाणारा ट्रक एम.एच. १८ बीए ९९९० यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. याचवेळी मितेशचे वडील नामदेव नरसिंग चव्हाण (वय४२) व त्यांचा पुतण्या राजेंद्र गलसिंग चव्हाण (वय ४२ ) हे मोटार सायकल क्र. एम.एच. २० एके २८०५ ने गाडीच्या मागेच येत होते. यावेळी ट्रकची त्यांनाही धडक बसली. दुहेरी अपघातात हे सर्व एकाच कुटुंबातील सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेली मिनाबाई रुमदेव चव्हाण (वय ४५ ) ही अत्यवस्थ असून तिला धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मयुर नामदेव चव्हाण (वय १५) याच्यावर चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घटनेविषयी कळताच माजी आमदारा राजीव देशमुख, माजी जि.प. सदस्य राजेंद्र वाडीलाल राठोड, प्रमोद पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, जगदीश चौधरी  माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालयात पहाटेच धाव घेतली. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. दरम्यान बोढरे गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघात