शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

रावेर तालुक्यात पिकांचे ६३ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 4:25 PM

कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तीन हजार हेक्टर व वादळी पावसाने केळीसह खरिपाचे १ हजार १२५. ९७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ६३ कोटी रुपयांची अपरिमित झाल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे.

ठळक मुद्देसततच्या मुसळधार पावसाने खरिपातील उभ्या ज्वारी व कापसाची धुळघाणज्वारी काळी होऊन, तर पांढऱ्या सोन्याच्या निम्मे कैºया सडून उत्पन्नात घट, शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल

किरण चौधरीरावेर : कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तीन हजार हेक्टर व वादळी पावसाने केळीसह खरिपाचे १ हजार १२५. ९७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ६३ कोटी रुपयांची अपरिमित झाल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे. तथापि, गत चार-पाच दिवसांपासून सातत्याने कुठे अर्धा तास, कुठे पाऊण तास तर कुठे तासभर कोसळधाºया पावसाने आता खरिपातील उभ्या कापसाच्या पिकाच्या निम्मे कैºया सडून काळ्या पडल्याने तर फुललेल्या बोंडातील कापूस ओला होऊन मातीमोल होत असल्याने तथा उभ्या ज्वारी पिकांची कणसे काळी पडून ऐन तोंडी आलेला उत्पन्नाचा घास वाया जाणार असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. बुधवारीही तालुक्यात दुपारी तासभर व सायंकाळीही मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.रावेर तालुक्यात जूनच्या आरंभी तीन टप्प्यात झालेल्या वादळी पावसाने ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त होऊन ३७ कोटींचे नुकसान झाले होते. तेव्हा शासन दरबारी नुकसानीचे पंचनामेही सादर करण्यात आले. किंबहुना, केळी फळपीक विमा कंपन्यांनी स्वतंत्र पंचनामे करून लाल फितीत बंदिस्त केले आहेत.दरम्यान, खरिपाच्या उडीद व मूग पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उडीद, मूगाच्या हंगामाचा पूर्णपणे बोजवारा उडाला. अपवादात्मक परिस्थितीत उडीद, मूगाचे आलेले चांगले उत्पादनही पावसात भिजल्याने हातचे गेल्याची शोकांतिका आहे. खरीप हंगामाची बोहणीच भोपळ्याने झाल्याने नेत्रसुखद असलेल्या खरिपातील कापूस, ज्वारी, मका, भुईमूग, सोयाबीन व तीळ पिकांना काळाची दृष्ट लागली.दरम्यान, कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तालुक्यातील तीन हजार हेक्टरमधील केळी बाधित होऊन ६० कोटी ५५ लाख रुपयांचे तर नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील पश्चिम भागात सातपुड्याच्या पायथ्यापासून ते तापी काठापर्यंत ३८ गावातील १ हजार १२५. ८७ हेक्टरमधील केळीबागा, ज्वारी, मका तूर व कापसाचे पीक जमीनदोस्त होऊन अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. एकंदरीत, ६३ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्रश्न निकाली निघत नाही तोच गत पाच-सहा दिवसांपासून अधून-मधून काही भागात अर्धा तास, काही भागात पाऊण तास तर काही भागात तासन् तास होत असलेल्या कोसळधार पावसाने आता उभ्या खरिपाचीही धुळघाण होऊन गंभीर वाताहत सुरू झाली आहे.तालुक्यात सरासरी ६५०.४३ मि.मी. अर्थात ९७.३६ टक्के पाऊस झाला असला तरी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐन कापणी व मळणीच्या प्रतीक्षेत असलेले ज्वारीचे कणसं काळी पडून ज्वारी रंगहीन व बुरशीने कुजून वजनाने हलकी होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे ज्वारीचचया उत्पन्नाचा ऐन तोंडी येणारा घास वाया जाण्याची शक्यता आहे. किंबहुना, खरीपपूर्व लागवडीखालील आघात कापसाच्या वेचणीच्या प्रतीक्षेत बोंडावर फुललेला कापूस सततच्या पावसामुळे ओला होऊन खाली पडून मातीमोल होत आहे. किंबहुना परिपक्व झालेल्या कापसाच्या झाडावरील निम्म्यापेक्षा जास्त कैºया काळ्या पडून सडत आहेत. त्यामुळे केळी बागायतीत व खरीप उत्पादनात उत्पन्नाची आशा कमालीची धुसर झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसRaverरावेर