५९ शाळा बंदचा प्रस्ताव

By Admin | Updated: June 5, 2014 13:46 IST2014-06-05T13:46:38+5:302014-06-05T13:46:38+5:30

जिल्ह्यातील २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ५९ शाळा बंद करण्याच्या प्रस्तावावर ५ रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे.

59 School Bandh Proposal | ५९ शाळा बंदचा प्रस्ताव

५९ शाळा बंदचा प्रस्ताव

जळगाव : जिल्ह्यातील २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ५९ शाळा बंद करण्याच्या प्रस्तावावर ५ रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे. 
शाळेत मूलभूत सुविधा नाहीत. दर्जेदार शिक्षण नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५९ शाळांमध्ये २0 पेक्षा कमी पटसंख्या आहे. अनेक शाळांमध्ये तर पाच पटसंख्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याही परिस्थितीत मीनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जि.प. प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली असून या शाळा आजपर्यंत सुरू ठेवल्या आहेत. 
उशिरा आली जाग?
जि.प. प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी तयार करण्यात आली आहे. ५ रोजी जि.प.च्या नवीन इमारतीमधील छत्रपती शाहू महाराज सभागृहात सकाळी ११ वाजता होणार्‍या सभेत या प्रस्तावावर चर्चा करण्यात येऊन शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 
विद्यार्थी हित लक्षात घेणार
जि.प. प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे कमी पटसंख्या असलेल्या ५९ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी ५ रोजी होणार्‍या सभेत विद्यार्थी हित लक्षात घेण्यात येणार आहे. 
गावापासून एक कि.मी. अंतराच्या आत असलेल्या शाळा सुरू राहतील अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. 
एरंडोलची एकही शाळा नाही 
दरम्यान, जि.प. प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात एरंडोल तालुक्यातील एकही शाळेचा समावेश नाही. या तालुक्यातील जि.प. शाळेत २0 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. यावल तालुक्यातील सर्वाधिक ९ जि.प. शाळांमध्ये २0 पेक्षा कमी पटसंख्या आहे.

बंद होणा-या शाळांचा प्रस्ताव

अमळनेर ३, भडगाव ३, भुसावळ ६, बोदवड २, चोपडा ३, चाळीसगाव २, धरणगाव ३, एरंडोल 0, जळगाव ४, जामनेर ३, मुक्ताईनगर ८, पारोळा ८, पाचोरा ३, रावेर २, यावल ९ ज

Web Title: 59 School Bandh Proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.