शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती...
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
5
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
6
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
7
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
8
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
9
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
10
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
11
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
12
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
13
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
14
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
15
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
16
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
17
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
18
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
19
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
20
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी

आत्मनिर्भर योजनेतंर्गत उभारलेल्या कंपनीचा ५५ कोटींचा टर्न ओव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:39 IST

जळगाव : कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि विदेशी साधन सामुग्रीचा वापर न करता आत्मनिर्भर होण्यासाठी अनुभवाला परिश्रमाची ...

जळगाव : कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि विदेशी साधन सामुग्रीचा वापर न करता आत्मनिर्भर होण्यासाठी अनुभवाला परिश्रमाची जोड देत अनिकेत भालचंद्र पाटील या युवकाने तब्बल ५५ कोटींचा टर्न ओव्हर असलेल्या सिंथेटीक आर्यन ऑक्साईड सिग्मेटच्या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचा वाढीव प्लांट कडगाव रस्त्यावर लवकरच सुरु होत आहे.

अनिकेत पाटील हे जळगाव पीपल्स बँकेत संचालक म्हणून गेल्या पाच वर्षापासून आहेत. ९ हजार टन क्षमता असलेल्या सिंथेटीक आर्यन ऑक्साईडच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांची सुरु असलेली वाटचाल ही युवकांसाठी प्रेरणादायी आहे.

आत्मनिर्भर योजनेतंर्गत सुरु करण्यात आलेल्या या कंपनीमध्ये सिंथेटीक आर्यन ऑक्साईड सिग्मेट तयार केले जात आहे. याचा वापर पेपर, प्लॅस्टीक, सनमाईक यासह काँक्रीट व पेव्हर ब्लाॅकसाठी वापरण्यात येणाऱ्या लाल व पिवळ्या रंगात केला जातो. एशियन, बर्जर, नॅरोलॅक या कंपन्यांना कच्चा माल पुरविण्याचे काम अनिकेत यांच्या कंपनीकडून केले जात असते.

आत्मनिर्भर योजनेतंर्गत सुरु करण्यात आलेल्या या कंपनीमध्ये सिंथेटीक आर्यन ऑक्साईड सिग्मेट तयार केले जात आहे. याचा वापर पेपर, प्लॅस्टीक, सनमाईक यात केला जातो.

सर्वत्र कुशल मनुष्यबळाची अडचण आहे. प्रत्येक उद्योगाला ही समस्या भेडसावत असते. त्यावर मात करण्यासाठी आम्ही यांत्रिकीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला. अत्याधुनिक यंत्र सामग्रीमुळे कमी मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त काम करता येत आहे. यासाठी स्वत: ग्रेड तयार केले.

शिक्षण घेत असताना केले कंपनीत काम

अनिकेत पाटील यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे जळगाव शहरात झाले आहे. त्यानंतर ११ वी व १२ वी हे मुंबईत झाले. पुढे डी.जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय मुंबई येथे बी.ई.केमिकल्सची पदवी प्राप्त केली. त्यानंतर मुंबई येथील एस.पी. जैन काॅलेजमध्ये एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला. या दरम्यान शिक्षणासोबतच कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करण्यास अनिकेत यांनी सुरुवात केली. शिक्षणाला अनुभवाची जोड मिळाल्याने त्याचा लाभ हा भविष्यात कंपनीच्या कामकाजात झाला. शिक्षणाच्या वेळी शिक्षण घेतल्यास पुढे काम करताना अडचणी येत नसल्याचे अनिकेत सांगतात.

कोट

विद्यार्थी दशेत असताना जास्तीत जास्त शिक्षण कसे घेता येईल याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अनेकदा शिक्षण घेण्याच्या काळात आपण मित्र, काॅलेज कट्टा, चित्रपट, माैजमजा या साऱ्याला प्राधान्य देत असतो. त्यामुळे आपल्याला पदवी तर मिळते मात्र सखोल ज्ञान मिळत नाही. मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतो त्यावेळी अडचणी येतात. त्यामुळे तरुणांनी त्या-त्या वेळी शिक्षणाला महत्व द्यावे

: अनिकेत पाटील, उद्योजक.