शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

आत्मनिर्भर योजनेतंर्गत उभारलेल्या कंपनीचा ५५ कोटींचा टर्न ओव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:39 IST

जळगाव : कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि विदेशी साधन सामुग्रीचा वापर न करता आत्मनिर्भर होण्यासाठी अनुभवाला परिश्रमाची ...

जळगाव : कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि विदेशी साधन सामुग्रीचा वापर न करता आत्मनिर्भर होण्यासाठी अनुभवाला परिश्रमाची जोड देत अनिकेत भालचंद्र पाटील या युवकाने तब्बल ५५ कोटींचा टर्न ओव्हर असलेल्या सिंथेटीक आर्यन ऑक्साईड सिग्मेटच्या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचा वाढीव प्लांट कडगाव रस्त्यावर लवकरच सुरु होत आहे.

अनिकेत पाटील हे जळगाव पीपल्स बँकेत संचालक म्हणून गेल्या पाच वर्षापासून आहेत. ९ हजार टन क्षमता असलेल्या सिंथेटीक आर्यन ऑक्साईडच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांची सुरु असलेली वाटचाल ही युवकांसाठी प्रेरणादायी आहे.

आत्मनिर्भर योजनेतंर्गत सुरु करण्यात आलेल्या या कंपनीमध्ये सिंथेटीक आर्यन ऑक्साईड सिग्मेट तयार केले जात आहे. याचा वापर पेपर, प्लॅस्टीक, सनमाईक यासह काँक्रीट व पेव्हर ब्लाॅकसाठी वापरण्यात येणाऱ्या लाल व पिवळ्या रंगात केला जातो. एशियन, बर्जर, नॅरोलॅक या कंपन्यांना कच्चा माल पुरविण्याचे काम अनिकेत यांच्या कंपनीकडून केले जात असते.

आत्मनिर्भर योजनेतंर्गत सुरु करण्यात आलेल्या या कंपनीमध्ये सिंथेटीक आर्यन ऑक्साईड सिग्मेट तयार केले जात आहे. याचा वापर पेपर, प्लॅस्टीक, सनमाईक यात केला जातो.

सर्वत्र कुशल मनुष्यबळाची अडचण आहे. प्रत्येक उद्योगाला ही समस्या भेडसावत असते. त्यावर मात करण्यासाठी आम्ही यांत्रिकीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला. अत्याधुनिक यंत्र सामग्रीमुळे कमी मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त काम करता येत आहे. यासाठी स्वत: ग्रेड तयार केले.

शिक्षण घेत असताना केले कंपनीत काम

अनिकेत पाटील यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे जळगाव शहरात झाले आहे. त्यानंतर ११ वी व १२ वी हे मुंबईत झाले. पुढे डी.जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय मुंबई येथे बी.ई.केमिकल्सची पदवी प्राप्त केली. त्यानंतर मुंबई येथील एस.पी. जैन काॅलेजमध्ये एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला. या दरम्यान शिक्षणासोबतच कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करण्यास अनिकेत यांनी सुरुवात केली. शिक्षणाला अनुभवाची जोड मिळाल्याने त्याचा लाभ हा भविष्यात कंपनीच्या कामकाजात झाला. शिक्षणाच्या वेळी शिक्षण घेतल्यास पुढे काम करताना अडचणी येत नसल्याचे अनिकेत सांगतात.

कोट

विद्यार्थी दशेत असताना जास्तीत जास्त शिक्षण कसे घेता येईल याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अनेकदा शिक्षण घेण्याच्या काळात आपण मित्र, काॅलेज कट्टा, चित्रपट, माैजमजा या साऱ्याला प्राधान्य देत असतो. त्यामुळे आपल्याला पदवी तर मिळते मात्र सखोल ज्ञान मिळत नाही. मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतो त्यावेळी अडचणी येतात. त्यामुळे तरुणांनी त्या-त्या वेळी शिक्षणाला महत्व द्यावे

: अनिकेत पाटील, उद्योजक.