शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हल्लाबोल मोर्चास जळगाव जिल्ह्यातून 3 हजारावर कार्यकर्ते जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 12:02 IST

सरकारविरुद्ध आंदोलन : शेतकरी आणि जनेतेच्या प्रश्नांचा आक्रोश

ठळक मुद्देजिल्ह्यातून 3 हजारावर कार्यकर्ते जाणारशरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अजित पवार आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चानागपूर येथे राष्ट्रवादी तर्फे प्रचंड हल्लाबोल मोर्चा

आॅनलाईन लोकमत

जळगाव- सरकार सर्वच पातळीवर अपयशी झाले आहे. शेतकरी आणि सामान्या जनता असे सर्वच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळ हैराण झाले आहेत. जनतेचा हा ‘आक्रोश’ प्रभावीपणे विधानसभेत पोहचविण्यासाठी नागपूर येथे राष्ट्रवादी तर्फे प्रचंड हल्लाबोल मोर्चा 12 रोजी काढला जात आहे. यासाठी जिल्ह्यातून पदाधिका:यांसह 3 हजारावर कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिली.

या मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील माजी आमदार तसेच पदाधिका:यांची बैठक बुधवारी दुपारी राष्ट्रवादी कार्यालयात झाली. यानंतर ही पत्र परिषद झाली. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफ्फार मलीक, माजी आमदार दिलीप वाघ व अरुण पाटील, अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महानगर अध्यक्ष निलेश पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ललित बागुल, महानगर जिल्हा अध्यक्षा निला चौधरी, जळगाव तालुका विधानसभाक्षेत्र प्रमुख राजेश पाटील, डॉ. राजेंद्र देसले, बापू चौधरी, निलेश बोदडे, सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी विविध कारणांनी अडचणीत सापडला आहे. पिकांना भाव नाही. धान्य खरेदी केंद्रही सुरु नाहीत. जी खरेदी होते ती अल्प प्रमाणात केली जाते.

कजर्माफीही फसवी ठरली आहे. सामान्य जनता महागाईत होरपळत आहे. जनतेचे हे सर्व प्रश्न घेवून 1 डिेसेंबर पासून यवतमाळ येथून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आक्रोश दिंडी निघाली आहे. ती नागपूरला 11 रोजी रात्री पोहचणार आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांचा 12 रोजी वाढदिवस असून शेतक:यांची स्थिती पाहता वाढदिवस साजरा न करता याच दिवशी नागपूर विधानभवनावर मोर्चा नेण्याचे आवाहन पवार यांनी केल्या नुसार जिल्ह्यातून मोठय़ा संख्येने कार्यकर्ते व शेतकरी जाणार आहेत, असेही त्यानी सांगितले. स्वत: शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणर असून शेवटी मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. या सरकारच्या कामांचा समाचार घेतला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. या मोर्चात शेतकरी व जनतेनेही मोठय़ संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पदाधिका:यांनी केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस