शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रदीप रायसोनींसह ९ जणांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 22:08 IST

जळगाव : घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर नाशिक कारागृहात असलेले माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्यासह ९ आजी, माजी नगरसेवकांना मुंबई ...

जळगाव : घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर नाशिक कारागृहात असलेले माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्यासह ९ आजी, माजी नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. गुरुवारी त्यांची कारागृहातून सुटका होऊ शकते. दरम्यान, याआधी २० नोव्हेंबर रोजी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना वैद्यकिय कारणास्तव तीन महिन्यासाठी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या अपीलावर पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.बुधवारी जामीन झालेल्यांमध्ये साधना कोगटा, अलका नितीन लढ्ढा, सुधा पाडूरंग काळे, लता रणजीत भोईटे, मीना अनिल वाणी, विजय पंडीतराव कोल्हे, प्रदीप ग्यानचंद रायसोनी व महेंद्र तंगू सपकाळे यांचा समावेश आहे. पुष्पा पाटील यांचा जामीन नियमित केला. राजा मयुर, मेजर नाना वाणी व पी.डी.काळे यांचा जामीन अद्याप मंजूर झालेला नाही. सरकारतर्फे अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी कामकाज पाहिले.घरकूल प्रकरणात धुळे जिल्हा न्यायालयाने सुरेशदादा जैन यांच्यासह ४७ जणांना दोषी ठरवून वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे. या सर्व आरोपींनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, त्याची बुधवारी सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे झाली. न्यायालयाने अटीशर्तीवर ९ जणांना जामीन मंजूर केला. दरम्यान,सुरेशदादांच्या अपीलावर पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव