शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जळगाव जिल्ह्यात १३३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:27 IST

ढगाळ वातावरण कायम, रब्बीचे नियोजन कोलमडले

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात अकाली आलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ सततच्या ढगाळ वातावरण व रिमझीम पडणाऱ्या या पावसामुळे पिके अक्षरश: सडायला लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे़ आतापर्यंत जिल्हाभरात १३३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़८० ते ८५ टक्के ज्वारीचे नुकसानमध्यतंरीच्या कालखंडात उन पडल्यानंतर ज्यांनी ज्यांनी ज्वारी काढली होती़ त्यांची पंधरा ते २० टक्के ज्वारी हाती लागली असून ८० ते ८५ टक्के ज्वारीचे पूर्णत: नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे़ यासह कपाशीला प्रथमच कोंब फुटण्याचे प्रकार होत आहे़ कपाशीची ५ लाख १० हजार हेक्टरवर लागवड होती़ यातील हलक्या जमीनीवरी कपाशीने तग धरला मात्र काळी जड जमिनीवरील कपाशीचे पूर्णत: नुकसान झाले आहे़ चारा पूर्णत: नष्ट झाला आहे़ यासह सोयाबीन व अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे़आॅक्टोबरमध्ये पावसाची धूमऐरव्ही आॅक्टोबर हिटचा अनुभव घेणाºया जिल्हावासीयांना यंदा आॅक्टोबरमध्ये पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे़आॅक्टोबरच्या अखेरीस झालेला हा अवकाळी पाऊस पिकांसाठी धोकादाक ठरला़ हा पाऊस नसता तर समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा होती़ आता पर्यंत जिल्हाभरात १३३ टक्के पाऊस झाला आहे़म्हसावद परिसरात मक्याला फुटले कोंबगेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे वावडदा, म्हसावद, बोरनार, जळके, विटनेर, पाथरी आदी गावात मका, कापूस, ज्वारीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मक्याच्या कणसाला कोंब फुटले आहेत तसेच मक्याचे दाणे गळून पडले आहेत. ज्वारीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांसाठी खर्च केलेले पैसेही शेतकºयांच्या पदरी पडणार नाहीत, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.अद्याप पंचनामे नाहीतनिवडणुकीच्या रणधुमाळीत व दिवाळीच्या सलग सुट्टुयांमुळे अकाली पावसाच्या नुकसानीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही़ पंचनाम्यांसंदर्भात अद्याप हालचाली नसल्याचे चित्र आहे़ दरम्यान, स्थानिक पातळीवर पंचनाम्यांसंदर्भात कळविण्यात आल्याचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले़ दरम्यान, अनेक भागांमध्ये पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण कायम असल्याने यामुळेही पिकांवर विपरीत परिणाम होत आहे़ मात्र, रब्बीत गहू व हरभºयाचे क्षेत्र वाढणार असून अडीच लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी ८ ते ९ नोव्हेंबरपासून हालचाली होणार असल्याचे समजते़सर्वाधिक रावेर तालुक्यात १४९ टक्के, जामनेर १४५ टक्के, बोदवड १४०, यावल १३९, पारोळा १३७, मुक्ताईनगर, एरंडोल १३५, चाळीसगाव १३२, भुसावळ १३२, पाचोरा १३१, भडगाव, १२९, अमळनेर १२८, चोपडा १२०, जळगाव ११४, धरणगाव ११२ असा प्रत्येक तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव