शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

जळगाव जिल्ह्यात १३३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:27 IST

ढगाळ वातावरण कायम, रब्बीचे नियोजन कोलमडले

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात अकाली आलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ सततच्या ढगाळ वातावरण व रिमझीम पडणाऱ्या या पावसामुळे पिके अक्षरश: सडायला लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे़ आतापर्यंत जिल्हाभरात १३३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़८० ते ८५ टक्के ज्वारीचे नुकसानमध्यतंरीच्या कालखंडात उन पडल्यानंतर ज्यांनी ज्यांनी ज्वारी काढली होती़ त्यांची पंधरा ते २० टक्के ज्वारी हाती लागली असून ८० ते ८५ टक्के ज्वारीचे पूर्णत: नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे़ यासह कपाशीला प्रथमच कोंब फुटण्याचे प्रकार होत आहे़ कपाशीची ५ लाख १० हजार हेक्टरवर लागवड होती़ यातील हलक्या जमीनीवरी कपाशीने तग धरला मात्र काळी जड जमिनीवरील कपाशीचे पूर्णत: नुकसान झाले आहे़ चारा पूर्णत: नष्ट झाला आहे़ यासह सोयाबीन व अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे़आॅक्टोबरमध्ये पावसाची धूमऐरव्ही आॅक्टोबर हिटचा अनुभव घेणाºया जिल्हावासीयांना यंदा आॅक्टोबरमध्ये पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे़आॅक्टोबरच्या अखेरीस झालेला हा अवकाळी पाऊस पिकांसाठी धोकादाक ठरला़ हा पाऊस नसता तर समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा होती़ आता पर्यंत जिल्हाभरात १३३ टक्के पाऊस झाला आहे़म्हसावद परिसरात मक्याला फुटले कोंबगेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे वावडदा, म्हसावद, बोरनार, जळके, विटनेर, पाथरी आदी गावात मका, कापूस, ज्वारीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मक्याच्या कणसाला कोंब फुटले आहेत तसेच मक्याचे दाणे गळून पडले आहेत. ज्वारीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांसाठी खर्च केलेले पैसेही शेतकºयांच्या पदरी पडणार नाहीत, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.अद्याप पंचनामे नाहीतनिवडणुकीच्या रणधुमाळीत व दिवाळीच्या सलग सुट्टुयांमुळे अकाली पावसाच्या नुकसानीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही़ पंचनाम्यांसंदर्भात अद्याप हालचाली नसल्याचे चित्र आहे़ दरम्यान, स्थानिक पातळीवर पंचनाम्यांसंदर्भात कळविण्यात आल्याचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले़ दरम्यान, अनेक भागांमध्ये पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण कायम असल्याने यामुळेही पिकांवर विपरीत परिणाम होत आहे़ मात्र, रब्बीत गहू व हरभºयाचे क्षेत्र वाढणार असून अडीच लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी ८ ते ९ नोव्हेंबरपासून हालचाली होणार असल्याचे समजते़सर्वाधिक रावेर तालुक्यात १४९ टक्के, जामनेर १४५ टक्के, बोदवड १४०, यावल १३९, पारोळा १३७, मुक्ताईनगर, एरंडोल १३५, चाळीसगाव १३२, भुसावळ १३२, पाचोरा १३१, भडगाव, १२९, अमळनेर १२८, चोपडा १२०, जळगाव ११४, धरणगाव ११२ असा प्रत्येक तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव