शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

जळगाव जिल्ह्यात १३३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:27 IST

ढगाळ वातावरण कायम, रब्बीचे नियोजन कोलमडले

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात अकाली आलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ सततच्या ढगाळ वातावरण व रिमझीम पडणाऱ्या या पावसामुळे पिके अक्षरश: सडायला लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे़ आतापर्यंत जिल्हाभरात १३३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़८० ते ८५ टक्के ज्वारीचे नुकसानमध्यतंरीच्या कालखंडात उन पडल्यानंतर ज्यांनी ज्यांनी ज्वारी काढली होती़ त्यांची पंधरा ते २० टक्के ज्वारी हाती लागली असून ८० ते ८५ टक्के ज्वारीचे पूर्णत: नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे़ यासह कपाशीला प्रथमच कोंब फुटण्याचे प्रकार होत आहे़ कपाशीची ५ लाख १० हजार हेक्टरवर लागवड होती़ यातील हलक्या जमीनीवरी कपाशीने तग धरला मात्र काळी जड जमिनीवरील कपाशीचे पूर्णत: नुकसान झाले आहे़ चारा पूर्णत: नष्ट झाला आहे़ यासह सोयाबीन व अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे़आॅक्टोबरमध्ये पावसाची धूमऐरव्ही आॅक्टोबर हिटचा अनुभव घेणाºया जिल्हावासीयांना यंदा आॅक्टोबरमध्ये पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे़आॅक्टोबरच्या अखेरीस झालेला हा अवकाळी पाऊस पिकांसाठी धोकादाक ठरला़ हा पाऊस नसता तर समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा होती़ आता पर्यंत जिल्हाभरात १३३ टक्के पाऊस झाला आहे़म्हसावद परिसरात मक्याला फुटले कोंबगेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे वावडदा, म्हसावद, बोरनार, जळके, विटनेर, पाथरी आदी गावात मका, कापूस, ज्वारीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मक्याच्या कणसाला कोंब फुटले आहेत तसेच मक्याचे दाणे गळून पडले आहेत. ज्वारीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांसाठी खर्च केलेले पैसेही शेतकºयांच्या पदरी पडणार नाहीत, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.अद्याप पंचनामे नाहीतनिवडणुकीच्या रणधुमाळीत व दिवाळीच्या सलग सुट्टुयांमुळे अकाली पावसाच्या नुकसानीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही़ पंचनाम्यांसंदर्भात अद्याप हालचाली नसल्याचे चित्र आहे़ दरम्यान, स्थानिक पातळीवर पंचनाम्यांसंदर्भात कळविण्यात आल्याचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले़ दरम्यान, अनेक भागांमध्ये पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण कायम असल्याने यामुळेही पिकांवर विपरीत परिणाम होत आहे़ मात्र, रब्बीत गहू व हरभºयाचे क्षेत्र वाढणार असून अडीच लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी ८ ते ९ नोव्हेंबरपासून हालचाली होणार असल्याचे समजते़सर्वाधिक रावेर तालुक्यात १४९ टक्के, जामनेर १४५ टक्के, बोदवड १४०, यावल १३९, पारोळा १३७, मुक्ताईनगर, एरंडोल १३५, चाळीसगाव १३२, भुसावळ १३२, पाचोरा १३१, भडगाव, १२९, अमळनेर १२८, चोपडा १२०, जळगाव ११४, धरणगाव ११२ असा प्रत्येक तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव