शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 13:53 IST

Uday Samant : उदय सामंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे धडाडीचे निर्णय घेत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने राज्यात लवकरच संवर्गनिहाय 2088 प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

जळगाव : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बहिणाबाई चौधरी यांच्या अध्यासन केंद्रासाठी राज्य शासनाकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी याबाबतची घोषणा शनिवारी जळगावात केली. 'उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ जळगाव' या कार्यक्रमासाठी उदय सामंत शनिवारी विद्यापीठात उपस्थित होते. यावेळी भाषणात त्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर जयश्री महाजन, प्रभारी कुलगुरू ई. वायुनंदन, प्रधान सचिव टिकाचंद रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसंचालक धनराज माने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे धडाडीचे निर्णय घेत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने राज्यात लवकरच संवर्गनिहाय 2088 प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे यापुढे आता कोणत्याही महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असलेला माणूस प्राचार्यच राहील, याची ग्वाही मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून देत असल्याचेही सामंत यांनी जाहीर केले. पण प्राचार्य म्हणून त्या व्यक्तीने त्या महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून ते महाविद्यालय क्रमांक एकचे महाविद्यालय राहील, अशा पद्धतीने कार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 9 तरुणांना अनुकंप तत्वावर तात्काळ नोकरीचे नियुक्तपत्र देण्यात आले. आजपर्यंत या तरुणांना अनुकंपा तत्वावर नोकरीपासून वंचित राहावे लागले; यामागे कदाचित यंत्रणेची चूक असेल. पण ही चूक आज सुधारली गेली असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, उदय सामंत यांनी आपल्या भाषणात विद्यापीठ प्रशासनाला काही सूचना देखील केल्या. विद्यापीठ आणि शासनाने एकत्र काम करायला हवे, यंत्रणेसोबत समन्वय असावा, असेही त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या कामाचे कौतुक!मंत्री उदय सामंत यांनी भाषणादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामाचे कौतुक केले. आज जळगाव विद्यापीठात प्रभारी कुलगुरू आहेत. विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळावेत म्हणून आपण राज्यपालांकडे मागणी आग्रहाने मांडावी. त्यांच्याकडून माझ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे न्याय मिळू शकतो. त्यांच्याकडे घटनात्मक पद असल्याने त्यांना मानसन्मान देणे आपले कर्तव्यच असल्याचेही सामंत म्हणाले.

बहिणाबाईंच्या पुतळ्यासाठी 1 कोटींचा निधीदरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी केली. बहिणाबाईंचा पुतळा विद्यापीठाच्या आवारात लवकरच उभारण्यात येणार आहे.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा मंत्र्यांना थेट सवालया कार्यक्रमाच्या दरम्यानच महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने अॅड. सुनील देवरे यांनी मंत्री उदय सामंत यांना उभं राहून प्रश्न विचारला. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका कधी सुरू करण्यात येतील? या संदर्भात राज्य शासनाने काय भूमिका घेतली आहे? याबाबत त्यांनी प्रश्न विचारत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत यांनी सांगितले की, या संदर्भात कार्यक्रमानंतर बोलूया. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि अडीअडचणी समजून घेण्यासाठीच मी या ठिकाणी आल्याचेही उदय सामंत यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू देण्याच्या मागणीसह इतर 32 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतJalgaonजळगावuniversityविद्यापीठ