शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

साडेचार हजार हेक्टरवर अडीच लाख मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 00:34 IST

पशुसंवर्धन विभागाच्या उपाययोजना : बारा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना मदत

जळगाव- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गुरांची चाऱ्यासाठी वणवण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून डिसेंबरच्या सुमारास शेतकऱ्यांना बियाणे वाटप करून ४ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची लागवड करून यातून २ लाख ७४ हजार ४०९ मेट्रीक टन चारा उत्पादित केला आहे. जिल्हाभरातील १२ हजार ७३४ शेतकऱ्यांना याची मदत झाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण गरज व उत्पादित चारा यातील तफावत बघता काही प्रमाणात चाऱ्याची चणचण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, जुलैपर्यंतचे नियोजन असले तरी पावसाने दांडी मारल्यास चारा छावण्याची गरज भासण्याची आवश्यकता विभागाने वर्तविली आहे.

दुष्काळाच्या परिस्थितीत चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने त्यातच पाणीटंचाई यामुळे मिळेल त्या भावात गुरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपल्याचे चित्र शनिवारी जळगावात भरलेल्या पशुबाजारात निदर्शनास आले होत़ मात्र, चाऱ्यांची टंचाई उद्भवू नये म्हणून आपण याचे कधीपासूनच नियोजन केलेले असते़ त्यानुसार चाऱ्याची लागवडही करण्यात येते़ शेतकऱ्यांना तो चारा वाटपही करण्यात आला आहे़ डिसेंबर व काही बियाणे जानेवारीत दिल्यानंतर दोन ते तीन महिन्यात त्याचे उत्पादन निघते.

आकडे बोलतातजिल्ह्यात सध्या ११ लाख ८५ हजार ३८० पशुधन आहे़प्रतिदिन ४ हजार ७७८ मे़ टन चारा लागतो़ऑक्टोबर १८ ते जुलै २०१९ पर्यंत १४ लाख ३३ हजार ५११ मे़ टन चारा लागणार आहेएकूण उत्पादित होणारा चारा १३ लाख ७८ हजार ८८९ आहे.

काही प्रमाणात चाऱ्याची टंचाईची परिथिस्ती या आकडेवारीवरून दिसते मात्र, शेळ्या मेंढ्यांना आपण चारा देत नाही, तरीसुध्दा त्यांना यात गणले जाते, कधी गरज पडल्यास त्यांनाही पुरविला जातो़ त्याप्रमाणे कृषी विभागाने केलेल्या उपायोजना यात ग्राह्य धरलेल्या नाहीत़ त्यामुळे सध्या तरी चाराटंचाईचा विषय बिकट नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ए़ एम़ इंगळे यांनी दिली. चारा लागवडीसाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते़ शेतकऱ्यांना डिसेंबरला बियाणे वाटप करण्यात आले. याची लागवड होऊन एप्रिल महिन्यात अडिच लाखांच्यावर चाऱ्याचे उत्पादन आलेले आहे़ दरम्यान, यंदा गाळपेरा जमिनीत चारा लागवडीसाठी धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांना २१ हजार ८५ किेलो चाºयाचे बियाणे वाटप करण्यात आले होते. त्यातून २७ हजार ६१८ मे़ टन चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित आहे.पाण्याची परिस्थिती बिकटजिल्हाभरात पाण्याचे स्त्रोत आटत आहे़ मोठ्या प्रमाणवर गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ अशा स्थितीत जिल्हाभरातील सर्व पशुधनाला २ कोटी ८६ लाख ११ हजार ५१० लिटर पाणी रोज लागते़ अशा स्थितीत गुरांचेही पाण्याअभावी हाल होत असतानाचे चित्र आहे. 

टॅग्स :cowगाय