शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

साडेचार हजार हेक्टरवर अडीच लाख मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 00:34 IST

पशुसंवर्धन विभागाच्या उपाययोजना : बारा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना मदत

जळगाव- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गुरांची चाऱ्यासाठी वणवण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून डिसेंबरच्या सुमारास शेतकऱ्यांना बियाणे वाटप करून ४ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची लागवड करून यातून २ लाख ७४ हजार ४०९ मेट्रीक टन चारा उत्पादित केला आहे. जिल्हाभरातील १२ हजार ७३४ शेतकऱ्यांना याची मदत झाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण गरज व उत्पादित चारा यातील तफावत बघता काही प्रमाणात चाऱ्याची चणचण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, जुलैपर्यंतचे नियोजन असले तरी पावसाने दांडी मारल्यास चारा छावण्याची गरज भासण्याची आवश्यकता विभागाने वर्तविली आहे.

दुष्काळाच्या परिस्थितीत चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने त्यातच पाणीटंचाई यामुळे मिळेल त्या भावात गुरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपल्याचे चित्र शनिवारी जळगावात भरलेल्या पशुबाजारात निदर्शनास आले होत़ मात्र, चाऱ्यांची टंचाई उद्भवू नये म्हणून आपण याचे कधीपासूनच नियोजन केलेले असते़ त्यानुसार चाऱ्याची लागवडही करण्यात येते़ शेतकऱ्यांना तो चारा वाटपही करण्यात आला आहे़ डिसेंबर व काही बियाणे जानेवारीत दिल्यानंतर दोन ते तीन महिन्यात त्याचे उत्पादन निघते.

आकडे बोलतातजिल्ह्यात सध्या ११ लाख ८५ हजार ३८० पशुधन आहे़प्रतिदिन ४ हजार ७७८ मे़ टन चारा लागतो़ऑक्टोबर १८ ते जुलै २०१९ पर्यंत १४ लाख ३३ हजार ५११ मे़ टन चारा लागणार आहेएकूण उत्पादित होणारा चारा १३ लाख ७८ हजार ८८९ आहे.

काही प्रमाणात चाऱ्याची टंचाईची परिथिस्ती या आकडेवारीवरून दिसते मात्र, शेळ्या मेंढ्यांना आपण चारा देत नाही, तरीसुध्दा त्यांना यात गणले जाते, कधी गरज पडल्यास त्यांनाही पुरविला जातो़ त्याप्रमाणे कृषी विभागाने केलेल्या उपायोजना यात ग्राह्य धरलेल्या नाहीत़ त्यामुळे सध्या तरी चाराटंचाईचा विषय बिकट नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ए़ एम़ इंगळे यांनी दिली. चारा लागवडीसाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते़ शेतकऱ्यांना डिसेंबरला बियाणे वाटप करण्यात आले. याची लागवड होऊन एप्रिल महिन्यात अडिच लाखांच्यावर चाऱ्याचे उत्पादन आलेले आहे़ दरम्यान, यंदा गाळपेरा जमिनीत चारा लागवडीसाठी धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांना २१ हजार ८५ किेलो चाºयाचे बियाणे वाटप करण्यात आले होते. त्यातून २७ हजार ६१८ मे़ टन चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित आहे.पाण्याची परिस्थिती बिकटजिल्हाभरात पाण्याचे स्त्रोत आटत आहे़ मोठ्या प्रमाणवर गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ अशा स्थितीत जिल्हाभरातील सर्व पशुधनाला २ कोटी ८६ लाख ११ हजार ५१० लिटर पाणी रोज लागते़ अशा स्थितीत गुरांचेही पाण्याअभावी हाल होत असतानाचे चित्र आहे. 

टॅग्स :cowगाय