शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

११० शेतकऱ्यांच्या खात्यात २४ लाखांची भरपाई जमा; सर्वाधिक चाळीसगाव तालुक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 13:42 IST

मृत जनावरांनुसार भरपाई

- कुंदन पाटील

जळगाव : लम्पी चर्मरोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांना २४ लाख ६ हजारांची भरपाई दोन दिवसांपूर्वी वितरीत करण्यात आली आहे.

राज्यात मार्च २०२० मध्ये देखील लम्पी या रोगाचे काही रुग्ण आढळले होते. त्यावेळी २ लाखांहून अधिक जणावरांना याची लागण झाली होती. त्यामधील फक्त १८ जनावरांना जीव गमवावा लागला होता. लम्पी चर्म रोग हा माणसांना होत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून हा संक्रमित होत नाही. त्याचबरोबर म्हशीला हा रोग होत नाही त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. लम्पी फक्त गाय आणि बैलाला होतो. 

जामनेर व चाळीसगावला फटकागेल्यावर्षी लम्पीचा सर्वाधिक फटका जामनेर तालुक्याला बसला होता. यंदा मात्र चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशी मिळते मदतलम्पी आजाराने गाय किंवा म्हैस मरण पावल्यास तीस हजार रुपये, बैल किंवा ओढकाम करणारे जनावरे मरण पावल्यास २५ हजार रुपये तर वासरू किंवा लहान जनावरे दगावल्यास सोळा हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यानुसार ११० शेतकऱ्यांना ही मदत दिली गेली आहे.

तालुकानिहाय भरपाईतालुका-गाय-बैल-वासरे-भरपाई (लाखात)चाळीसगाव-२०-१५-३८-१५.७२धरणगाव-००-०२-०१-०.६६एरंडोल-०२-०८-०८-३.८८जळगाव-०१-००-००-०.३०पाचोरा-०१-०२-०३-१.२८एकूण-२७-३१-५२-२४.०६पहिल्या टप्प्यातील भरपाईची रक्कम बाधीत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मदतही उपलब्ध केली जाईल.-शामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव