शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

८० गाव पाणी योजनांचे २४ कोटी ‘पाण्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील ८० गाव सामुदायिक पाणीपुरवठा योजनांची दहा तालुक्यांमध्ये तब्बल २४ कोटींची थकबाकी असल्याचा मुद्दा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील ८० गाव सामुदायिक पाणीपुरवठा योजनांची दहा तालुक्यांमध्ये तब्बल २४ कोटींची थकबाकी असल्याचा मुद्दा समोर आला आहे. ग्रामसेवकांकडून ७० टक्क्यांपेक्षा अधिक वसुली दाखविली जात असताना इतकी मोठी थकबाकी कशी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून वसुलीकडे दुर्लक्ष झाल्याने यात नेमकी वस्तुस्थिती काय? अशी विचारणा आता जि. प. सदस्यांमधून होत आहे. यात बोदवड तालुक्यात सर्वाधिक ७, तर भुसावळ तालुक्यात ५ कोटी रुपये थकलेले आहेत.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या पाणी योजना राबविण्यात आल्या. प्रत्यक्ष नागरिकांकडून ग्रामपंचायतींनी वसुली केली. मात्र, ती जि.प.कडे भरलेलीच नाही. बहुतांश योजना या वीज बिल थकल्याने बंद आहेत. देखभाल दुरुस्ती नाही, अशा परिस्थितीत ही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहत असल्याचे समोर येत आहेत. स्थायी समितीच्या सभेत या मुद्द्यावर मोठी खडाजंगी झाली होती. यात बोदवड तालुक्यात सर्वाधिक ७ कोटी रुपये थकले आहेत.

जनता पाण्यापासून वंचित : नानाभाऊ महाजन

एकीकडे ७० टक्क्यांपेक्षा कमी वसुली असेल तर ग्रामसेवकांना पदावर राहता येत नाही. त्यामुळे वसुलीही ७० टक्क्यांपेक्षा अधिकच असते. असे असताना पाणी योजनांची ऐवढी थकबाकी असणे याचा अर्थ ग्रामसेवकांनी हा पैसा भरलेलाच नाही. त्यामुळे यंत्रणेकडूनच यंत्रणेची ही फसवणूक असल्याचा आरोप शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केला आहे. या दुर्लक्षामुळे योजनांचे वीज जोडणी तोडण्यात आली असून जनता पाण्यापासून वंचित आहे. याला गटविकास अधिकारी व ग्रामसेवक जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

८० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

पाणीपुरवठा योजनांवर कार्यरत ८० कर्मचाऱ्यांना कुठलाच लाभ मिळालेला नसून त्यांचे वेतनही थकले आहे. या कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती येऊन ठेपल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षे ही वसुली होत नसल्याने या कर्मचाऱ्यांचे पगार हे सेस फंडातून जेवढी तरतूद तेवढेच होत आहे. त्यात काही महिन्यांचे वेतन मिळते, तर अनेक महिन्यांचे रखडते. त्यामुळे त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

अशी आहे तालुकानिहाय थकबाकी

रावेर तालुका ३८ लाख ४७ १५०

पारोळा : ९१ लाख ५४ हजार ५११

जामनेर : १ कोटी ४२ लाख ४ हजार ७२९

चाळीसगाव : २७ लाख ७८ हजार ६७

बोदवड : ७ कोटी ७७ लाख १ हजार २०३

मुक्ताईनगर : २२ लाख ७०८

एरंडोल : ३ कोटी ६० हजार ९६४

भुसावळ : ५ कोटी ५८ लाख ८ हजार ८५०

वरणगाव : १ कोटी ५३ लाख ४२ हजार ३६५

जळगाव : ३ कोटी ४ लाख ८२ हजार ५९९

कोट

तालुकास्तरावर कॅम्प लावून याबाबत गटविकास अधिकाऱ्यांमार्फत वसुलीचे सोमवार ते मंगळवारपासून नियोजन करण्यात येणार आहे. यातील काही योजना सुरू आहेत.

-गणेश भोगावडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग