शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भुसावळच्या २३ सायकलपटूंनी पूर्ण केले पाल सायकलिंग चॅलेंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 14:18 IST

भुसावळच्या २३ सायकलपटूंनी पाल सायकलिंग चॅलेंज बुधवारी पूर्ण केले.

ठळक मुद्देभुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे आयोजन सर्व सायकलपटूंनी निर्धारित वेळेच्या आत स्पर्धा पूर्ण केली

भुसावळ : स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे  ‘पाल अल्ट्रा हिल सायकलिंग चॅलेंज’  या १०० किलोमीटर व ५० किलोमीटर सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अवघड अशा या स्पर्धेत २३ सायकलपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. ५० किलोमीटरसाठी भुसावळ ते खिरोदा व पुन्हा परत भुसावळ असा मार्ग होता, तर १०० किलोमीटरसाठी भुसावळ खिरोदा पाल व त्याच मार्गे परत भुसावळ असा मार्ग होता. मार्गात ठिकठिकाणी सायकलपटूंचे उपस्थित ग्रामस्थ आस्थेने विचारपूस करीत होते व कौतुक करीत होते. सकाळी सहाला उपविभागीय पोलीस उपअधीक्षक  सोमनाथ वाकचौरे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेस सुरुवात झाली. याप्रसंगी  वाकचौरे यांनी सायकलपटूंनीअवघड अशा मार्गावर सायकल चालवणे आव्हानात्मक असून त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला उपक्रम राबविल्याबद्दल भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनचे अभिनंदन केले. ५० किलोमीटरसाठी ३ तास ३० मिनिटे तर १०० किलोमीटरसाठी ८ तास ३० मिनिटांचा कमाल कालावधी ठरविण्यात आला होता. सर्व सायकलपटूंनी निर्धारित वेळेच्या आत स्पर्धा पूर्ण केली. सर्व यशस्वी सायकलपटूना प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात येईल, अशी माहिती संयोजक प्रवीण पाटील व ब्रिजेश लाहोटी यांनी दिली.  या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पूनम कुलकर्णी या महिला सायकलपटूने १०० कि.मी.  गटात प्रतिनिधित्व करून ही स्पर्धा सहजपणे पूर्ण केली. त्यांच्याशिवाय सीमा पाटील व सोनाली पाटील यांनीदेखील ५० किलोमीटरमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. तसेच प्रशांत अत्रे यांनी १०० किलोमीटरचे अंतर सिंगल गिअरच्या सायकलने सहज  पूर्ण केले. पालचा सातपुडा डोंगर पार करणे आव्हानात्मक होते परंतु भुसावळ रनर्सच्या सदस्यांनी ठिकठिकाणी केलेली पाणी व फळांची व्यवस्था तसेच त्यांनी केलेल्या कौतुकामुळे आम्ही ही स्पर्धा सहजपणे पूर्ण करू शकलो, असे अँड.दिलीप जोनवाल व डॉ. तुषार पाटील यांनी सांगितले. भुसावळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रिया पाटील व हर्षल लोखंडे, खिरोदा येथे शेख रिजवान व श्रीकांत नगरनाईक तर पाल येथे अजय पाटील व राजेंद्र ठाकूर हे प्रत्येक स्पर्धकाच्या वेळेची नोंद घेत होते. ही संपूर्ण स्पर्धा भुसावळ तालुक्यातील प्रथम बीआरएम विलास पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेआधी पूनम भंगाळे यांनी वॉर्मअप घेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.नीलिमा नेहेते होत्या.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी छोटू गवळी, रणजित खरारे, स्वाती फालक,  चारुलता अजय पाटील, प्रमोद शुक्ला, सरोज शुक्ला यांनी सहकार्य केले.सहभागी स्पर्धक : अथर्व शितोळे, भाऊसाहेब पाटील, चंद्रशेखर सोनवणे, चेतनकुमार शाह, दत्तू सपकाळे, जयश्री पाटील, कैलास छाबरा, नितीन साळुंके,  नितीन रमानी, प्रकाश अटवाणी, सचिन मनवानी, सीमा पाटील, उमेश घुले, योगेश लुंकड, डॉ.महेश फिरके, डॉ.तुषार पाटील, प्रशांत अत्रे, पूनम कुलकर्णी, अँड.दिलीप जोनवाल. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ