शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

६३१ ठेव पावत्यांद्वारे १८ कोटींची रक्कम कर्जखात्यात समायोजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

जळगाव : बीएचआर प्रकरणात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भागवत भंगाळे, प्रेम कोगटा यांच्यासह संशयितांनी एजंटमार्फत ६३१ ...

जळगाव : बीएचआर प्रकरणात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भागवत भंगाळे, प्रेम कोगटा यांच्यासह संशयितांनी एजंटमार्फत ६३१ पावत्यांच्या १७ कोटी ९५ लाख ९० हजार ३७४ रुपये रकमेचे आपल्या वैयक्तिक कर्जामध्ये समायोजन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या १२ संशयितांना अटक केल्यानंतर ज्या एजंटच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे त्यांचा शोध सुरू केला आहे.

पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे़ याप्रकरणी २६ नोव्हेंबर रोजी १३५ जणांचे पथक जळगावात दाखल होते. त्याच प्रकरणात पुन्हा पुणे पोलिसांची ५० जणांची १० पथके गुरुवारी जळगावात आली होती. तर पाच पथक औरंगाबाद तसेच मुंबई, अकोला व पुणे येथे पाठविण्यात आली होती. या पंधरा पथकांनी एकाच वेळी धाडसत्र राबवून सराफ तथा हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे प्रेम नारायण कोगटा, जयश्री मणियार, संजय तोतला (सर्व रा़ जळगाव), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेंद्र लोढा (सर्व रा़ जामनेर), भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष मुन्ना तेली यांचा मुलगा आसिफ तेली, प्रीतेश जैन (रा़ धुळे), अंबादास मानकापे (रा.औरंगाबाद), जयश्री तोतला (जळगाव) व प्रमोद कापसे (रा़ अकोला) या १२ जणांना अटक केली.

मध्यरात्री पथक पुण्याला रवाना

गुरूवारी सकाळी पुणे पोलिसांचे दहा पथक जळगावात दाखल झाले होते. दिवसभर अटक, पंचनामा व इतर प्रक्रिया पूर्ण करून ही पथके गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास संशयितांना घेऊन पुण्यासाठी रवाना झाले. दरम्यान, गुरुवारी प्रेम कोगटा, जयश्री तोतला व अंबादास मानकापे या संशयितांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना सुनावणीअंती २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे उर्वरित नऊ जणांना शुक्रवारी सकाळी ११.५५ वाजता पुणे न्यायालयातील न्या. नांदेडकर यांच्या न्यायालयात पोलिसांनी हजर केले. या नऊ जणांनादेखील न्यायालयाने २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

बीएचआरसंबंधी कागदपत्र जप्त

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षक सुचिता खोकले यांचे पथकाने दिवसभर संशयितांची घरांची तपासणी केली़ यात बीएचआर संबंधित जी कागदपत्रे आढळून आली, ती ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती खोकले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़

३० टक्के रक्कम देऊन खरेदी केल्या ठेव पावत्या

दरम्यान, संशयित आरोपींनी वेगवेगळ्या ठेवीदारांच्या ठेवी कमी किमतीत घेऊन कर्जाचे पूर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. इतकेच नव्हे तर असे करताना संशयितांनी स्वत: नेमलेल्या एजंटमार्फत ठेवीदारांमध्ये सदर पतसंस्था बुडाली असून मुदत ठेवीच्या ३० टक्के रक्कम मिळेल. परंतु, त्यासाठी मूळ पावत्या जमा करून तयार करून आलेल्या प्रतिज्ञा पत्रावर सह्या कराव्या लागतील. अन्यथा कुणालाच ठेवीचे पैसे मिळणार नाहीत. ठेवीदारांच्या ठेवी बुडाल्यात जमा आहेत. पतसंस्थेकडून पैसे मिळणे अशक्य आहे. अशी भीती निर्माण करून ३० टक्के रक्कम देऊन ठेव पावत्या खरेदी करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केले असल्याचे समोर आले आहे.

ते एजंट कोण?

संशयितांनी एजंट अनिल पगारिया, संतोष बाफना, अशोक रुणवाल, अजय ललवाणी यांच्यासह अन्य एजंटची साखळी तयार केली होती. संशयितांनी ठेव पावत्या ठेवीदारांकडून गोळा करण्यासाठी नेमलेले एजंट कोण-कोण आहेत व त्याचा गुन्ह्यात काय सहभाग आहे, याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच तपासात सुनील झंवर व सुरज झंवर यांच्या कार्यालयातील संगणकामध्ये ठेवीदार व कर्जदार यांच्या याद्या पोलिसांना मिळून आल्या आहेत. या याद्यांशी त्यांचा काय संबंध आहे, या दिशेनेही पोलिसांना तपास सुरू आहे.

कर्ज प्रकरणांच्या तडजोडीसाठी घेतल्या बैठका

बीएचआरच्या मुख्य कार्यालयात विविध कर्ज प्रकरणांची तडजोड करण्यासाठी बैठक घेण्यात आल्याचेही पुणे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याचबरोबर कर्ज निरंकच्या खोट्या नोंदी अवसायक जितेंद्र कंडारे, सुजीत वाणी यांनी केल्या असून त्यांचा गुरूवारी अटक केलेल्या संशयितांचा काय संबंध आहे, या दिशेनेही पुणे पोलीस तपास करीत आहेत.

विविध जिल्ह्यात जाणार पथक

तपासाच्या दृष्टीने अटकेतील आरोपींच्या बँक खात्यांची तसेच गुंतवणुकीची माहिती पोलीस गोळा करणार आहेत. बीएचआर व्यतिरिक्त संशयितांच्या कुठे-कुठे बैठक झाल्या, खोटे दस्तऐवज कुठे बनविण्यात आले आहे याचा तपास पोलीस करणार आहेत़ तसेच संशयित हे जळगाव, मुंबई, औरंगाबाद येथील रहिवासी असून त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी वर्ग करून घेतल्या आहेत. याच्या तपासासाठी विविध जिल्ह्यांमध्ये पुणे पोलिसांचे पथक जाणार आहे.