शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

१४ मार्केटबाबत स्वतंत्र विचार करा, अन्यथा गोळ्या झाडा, पैसे भरणे शक्यच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत मनपाकडून येत्या महासभेत महत्त्वाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत मनपाकडून येत्या महासभेत महत्त्वाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावानुसार ज्या गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली नाही, तसेच मुदत संपून देखील गाळे खाली केले नाहीत, असे गाळे जप्त करून, ते त्या गाळ्यांचा लिलाव करण्याचा हालचाली मनपाकडून सुरू आहेत. मात्र, मनपाने हा प्रस्ताव सादर करण्याआधी १४ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांबाबत स्वतंत्र विचार करणे गरजेचे आहे. मनपाने निर्लेखित केलेले भाडे या मार्केटमधील गाळेधारकांना भरणे शक्यच नसून, मनपाने गाळेधारकांना गोळ्या माराव्यात, मात्र गाळेधारक अवाजवी भाडे भरणार नाहीत अशी थेट भूमिका गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी घेतली आहे.

तब्बल ९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही निकाली निघालेला नाही. आता १८ रोजी होणाऱ्या महासभेत मनपा प्रशासन हे गाळे लिलाव करण्याचा प्रस्ताव सादर करणार आहे. अशा परिस्थितीत गाळेधारकांकडून देखील या प्रस्तावाबाबत लोकप्रतिनिधींशी बोलणे सुरू झाले आहे. गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा करून, १४ मार्केटमधील गाळेधारकांबाबत योग्य भूमिका घेण्याची मागणी केली आहे. यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशीही चर्चा करून, याबाबत शासनाकडून ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

जुन्या भाड्यानुसार दुप्पट आकारणी केली तरी चालेल

अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांच्या प्रश्नी मनपाने नवीन भाडेदरानुसार आकारणी न करता २०१२ च्या जुन्या भाडेप्रमाणी आकारणी करण्याची मागणी गाळेधारकांनी केली आहे. त्या भाड्यात दुप्पटची आकारणी केली तरी चालेल अशी भूमिकाच गाळेधारकांनी घेतली आहे. तसेच आयुक्तांना जे गाळेधारक भाड्याची रक्कम भरू शकत नाही, त्यांचे दर कमी करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर आयुक्तांनी करावा, अशीही मागणी गाळेधारकांनी केली आहे. मनपाने तर गाळेधारकांबाबत अन्यायाची भूमिका घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गाळेधारक संघटनेने घेतला आहे.

डॉ.गुरुमुख जगवाणी यांचे जयंत पाटलांना साकडे

गाळेप्रकरणी शासनाचे धोरण ठरत नसल्याने पुढील दिशा अद्याप निश्चित होत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्ह्यात आले असता डॉ.गुरुमुख जगवाणी यांनी गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना साकडे घातले आहे. लाखो कुटुंबांचा संसार मनपाच्या व्यापारी गाळ्यांवर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर कोणतेही ठोस धोरण निश्चित केले जात नसल्याने आजपर्यंत त्यावर तोडगा निघालेला नाही. गाळेधारकांवर अन्याय होऊ नये यासाठी महाआघाडी सरकारच्या काळात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी डॉ.जगवाणी यांनी केली आहे.