शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

१३ लाख ४ हजार मतदार बजवणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:14 AM

जळगाव : जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १३ लाख ४ हजार ९२३ मतदार आपला ...

जळगाव : जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १३ लाख ४ हजार ९२३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी प्रशासनही सज्ज झाले असून ईव्हीएम मशिन व इतर आवश्यक साधन सामग्री केंद्रांना गुरूवारीचं रवाना करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी २३ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली होती. निवडणुकीसाठी २० हजार २६४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात २८८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. तर १९ हजार ९७६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. माघारीच्या दिवशी ६ हजार १२९ उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यामुळे निवडणूकीसाठी १३ हजार २४७ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे ९६ ग्रामपंचायतींची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. त्यामुळे ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे.

१३ लाख ४९२३ मतदार

जळगाव जिल्ह्यात ग्रा.पं.निवडणुकीसाठी १३ लाख ४९२३ मतदार आहेत. त्यामध्ये ६ लाख २६ हजार ७ महिला तर ६ लाख ७८ हजार ९०६ पुरूष मतदार आहे. इतर १० मतदार आहेत. शुक्रवारी मतदान मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहे. तसेच मतदान करण्यासाठी सुट्टी किंव दोन तासांची सवलत देण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत.

असे आहेत तालुका निहाय मतदार

जळगाव (१०८४३६), जामनेर (१३४१८३), धरणगाव (६१३८०), एरंडोल (६४४३०), पारोळा (७०६१८), भुसावळ (६७८५८), मुक्ताईनगर (७६३००), बोदवड (३४५२०), यावल (९५०२७), रावेर (८३५२४), अमळनेर (६८२७१), चोपडा (८५४५८), पाचोरा (१५४७३८), भडगाव (५४२६८), चाळीसगाव (१४५९१२).