शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

युवक-युवतींनी समाज, कुटुंबाप्रती संवेदनशील राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:07 IST

समाज, कुटुंबाप्रती युवकांनी संवेदनशील रहावे, असा सूर शहरात आयोजित अग्र- महाकुंभमधील चर्चासत्रात सहभागी वक्त्यांमधून निघाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजच्या युवकांकडे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. परंतु, कम्युनिकेशन (आपापसातील संवाद) हरपत चालला आहे. ‘आपण आणि आपले बरे’, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे कुठे तरी थांबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. तसेच समाज, कुटुंबाप्रती युवकांनी संवेदनशील रहावे, असा सूर शहरात आयोजित अग्र- महाकुंभमधील चर्चासत्रात सहभागी वक्त्यांमधून निघाला.दानकँुवर महाविद्यालयातील प्रांगणात अग्रवाल समाजाचे २४ वे प्रांतीय संमेलन अर्थात अग्र- महाकुंभ आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ज्येष्ठ पदाधिकारी विजय चौधरी, महामंत्री गोपाल अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यानिमित्त आयोजित ‘युवा चेतना’ या चर्चासत्रात छत्तीसगड येथील प्रसिध्द वक्ते हरीश मंत्री आणि पुणे येथील द्वारकाप्रसाद जालान यांनी विचार मांडले. युवकांनी समाजाप्रती संवेदना ठेवली पाहिजे. समाजाचे आणि कुटुंबाचे आपण घटक असल्याने त्यांचा विचार होणे गरजेचे आहे. आज माणसाकडे स्वत:साठी वेळ आहे. परंतु, समाजासाठी वेळ खर्ची करण्यास आजचा युवक धजावत नाही.एकूणच आज संपर्काची अनेक साधने उपलब्ध असली तरी आपल्या मनात दडलेले दु:ख हे कोणाजवळ व्यक्त करावे, अशी विश्वासू व्यक्ती सापडत नाही. त्यामुळे वडील, मुलगा, नोकर हे देखील एक चांगले मित्र होऊ शकतात. ज्यांच्या जवळ तुम्ही तुमच्या भाव-भावना आणि दु:ख व्यक्त करू शकता. आयुष्यात काही मिळविण्याच्या नादात जगणं विसरत चाललो आहोत. याचे भान कुणालाही नाही. त्यामुळेच जे जीवन मिळाले आहे ते जास्तीत जास्त आनंदाने कसे जगता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे.आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावेयावेळी मंत्री यांनी सांगितले की, आपल्याजवळ जे काही आहे, त्या पलीकडेही मोठे जग आहे. त्याकडे लक्ष वेधताना आयुष्याकडे बघताना सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, त्यासाठी दृष्टीकोन बदलणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार तथा अग्रवाल प्रांतीय समाजाचे अध्यक्ष किरण अग्रवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष देविदान, उद्योजक घनशाम गोयल, दिनेश भारूका, सरिता बगडिया, पुरूषोत्तम जयपुरिया, संजय अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, डॉ. अनिता तवरावाला, संदीप गिंदोडिया, मनिष तवरावाला हे प्रयत्न करत आहेत.संमेलनात आज अनेक ठरावजालना येथे २४ वे अग्रवाल संमेलन भरविण्यामागचा उद्देश सकारात्मक दृष्टीकोन वाढविणे आणि ज्या काही समाजामध्ये अनिष्ट प्रथा, रूढी आहेत, त्यांना तिलांजली देऊन नवीन समाज निर्मिती करण्यासाठी रविवारी या संमेलनात विविध ठराव संमत करण्यात येणार आहेत.

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिकFamilyपरिवार