शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

कर्जमाफीचे १२५० कोटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:48 AM

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला १ हजार २५० कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यात प्रारंभी पंतप्रधान किसान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचा तिसरा हप्ता मिळाला नाही, अशा जवळपास १ लाख ३० हजार शेतक-यांचे खातेक्रमांक, आयएफसी कोड जुळत नसल्याने अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. यासाठी तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांनी ज्या शेतक-यांच्या या अडचणी आहेत, त्या सोडविण्यासाठी त्या त्या गावात जाऊन १५ दिवसांत हा प्रश्न निकाली काढावा असे निर्देश टोपे यांनी दिले.यासह वादळी वारे आणि गारपीट तसेच अवकाळी पाऊस यामुळे देखील शेतक-यांचे गेल्या वर्षी मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्याला ४८० कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यातील केवळ ५१ कोटी रुपये येणे अद्याप शिल्लक आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत १ लाख ९० हजार शेतक-यांपैकी केवळ २ हजार शेतक-यांचे आधारलिंक अपडेट करणे शिल्लक आहे. तेदेखील आठवड्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा सहकार उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, बाळासाहेब वाकुळणीकर यांच्यासह तहसीलदार, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.बैठक : अधिका-यांनी आळस झटकावाशासन पातळीवरुन सर्व ती मदत शेतक-यांसाठी केली जात आहे. असे असले तरी प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी पाहिजे त्या तत्परतेने काम करत नसल्याचे दिसून आले. अधिका-यांनी आळस झटकून काम करावे नसता कामे न करणाºयांची स्वतंत्र यादी बनवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीfundsनिधी