शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कर्जमाफीचे १२५० कोटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 00:48 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला १ हजार २५० कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यात प्रारंभी पंतप्रधान किसान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचा तिसरा हप्ता मिळाला नाही, अशा जवळपास १ लाख ३० हजार शेतक-यांचे खातेक्रमांक, आयएफसी कोड जुळत नसल्याने अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. यासाठी तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांनी ज्या शेतक-यांच्या या अडचणी आहेत, त्या सोडविण्यासाठी त्या त्या गावात जाऊन १५ दिवसांत हा प्रश्न निकाली काढावा असे निर्देश टोपे यांनी दिले.यासह वादळी वारे आणि गारपीट तसेच अवकाळी पाऊस यामुळे देखील शेतक-यांचे गेल्या वर्षी मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्याला ४८० कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यातील केवळ ५१ कोटी रुपये येणे अद्याप शिल्लक आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत १ लाख ९० हजार शेतक-यांपैकी केवळ २ हजार शेतक-यांचे आधारलिंक अपडेट करणे शिल्लक आहे. तेदेखील आठवड्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा सहकार उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, बाळासाहेब वाकुळणीकर यांच्यासह तहसीलदार, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.बैठक : अधिका-यांनी आळस झटकावाशासन पातळीवरुन सर्व ती मदत शेतक-यांसाठी केली जात आहे. असे असले तरी प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी पाहिजे त्या तत्परतेने काम करत नसल्याचे दिसून आले. अधिका-यांनी आळस झटकून काम करावे नसता कामे न करणाºयांची स्वतंत्र यादी बनवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीfundsनिधी