शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

यंदा केवळ ५८ गावांनाच बसणार टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 01:08 IST

परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणी टंचाईची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संपूर्ण पावसाळा संपल्यावरही पावसाने जिल्ह्याची सरासरी गाठली नव्हती. परंतु परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणी टंचाईची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे. या अवकाळी पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. असे असले तरी यंदा पाणी टंचाई पूर्वीप्रमाणे तीव्र होणार नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.गेल्या वर्षी पाणी टंचाईने हैराण असलेल्या जालनेकरांना यंदा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी टँकरची संख्या ही ५०० पेक्षा अधिक झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासन त्रस्त झाले होते. कोट्यवधी रूपये टँकरचे बिल देण्यावर शासनाचा खर्च झाला आहे. ही टंचाई जाणवू नये म्हणून गेल्या पाच वर्षात राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना आणली होती. परंतु या योजनेचाही पाहिजे तेवढा परिणाम झाला नाही. ही कामे करताना अनेकवेळा निकष बदलले गेल्याने देखील कामांमध्ये दर्जा राहिला नसल्याचे चित्र आहे.जालना जिल्हा हा पूर्वीपासूनच दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे पक्के स्त्रोत येथे नसल्याने दिवाळी नंतरच पाणी टंचाईच्या झळा येथे सुरू होतात. यंदा दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाचा मोठा दिलासा टंचाई निवारण्यासाठी मिळाल्याने प्रशासनाने आणि राजकीय नेत्यांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.जालना येथील भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हयातील पाणी टंचाईचा आढावा हा जिल्ह्यातील ११० विहिरींमधील पाणी पातळीचा अभ्यास करून घेतला. त्यात यंदा जवळपास सर्वच विहिरींची पाणीपातळी एक मीटरने वाढली आहे.अपवाद केवळ जालना, बदनापूर तसेच मंठा तालुक्यातील काही विहिरींचा देता येईल. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ ही खऱ्या अर्थाने मार्च ते जून या कालावधीत जाणवू शकते आणि ती देखील केवळ ५८ गावांमध्ये ही टंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते, असा अहवाल जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातRainपाऊसWaterपाणी