शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
2
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
3
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
4
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
5
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
6
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
7
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
8
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
9
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
10
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
11
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
12
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
13
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
14
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
15
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
16
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
17
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
18
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
19
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
20
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर

यंदा केवळ ५८ गावांनाच बसणार टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 01:08 IST

परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणी टंचाईची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संपूर्ण पावसाळा संपल्यावरही पावसाने जिल्ह्याची सरासरी गाठली नव्हती. परंतु परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणी टंचाईची दाहकता कमी होण्यास मदत झाली आहे. या अवकाळी पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. असे असले तरी यंदा पाणी टंचाई पूर्वीप्रमाणे तीव्र होणार नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.गेल्या वर्षी पाणी टंचाईने हैराण असलेल्या जालनेकरांना यंदा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी टँकरची संख्या ही ५०० पेक्षा अधिक झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासन त्रस्त झाले होते. कोट्यवधी रूपये टँकरचे बिल देण्यावर शासनाचा खर्च झाला आहे. ही टंचाई जाणवू नये म्हणून गेल्या पाच वर्षात राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना आणली होती. परंतु या योजनेचाही पाहिजे तेवढा परिणाम झाला नाही. ही कामे करताना अनेकवेळा निकष बदलले गेल्याने देखील कामांमध्ये दर्जा राहिला नसल्याचे चित्र आहे.जालना जिल्हा हा पूर्वीपासूनच दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे पक्के स्त्रोत येथे नसल्याने दिवाळी नंतरच पाणी टंचाईच्या झळा येथे सुरू होतात. यंदा दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाचा मोठा दिलासा टंचाई निवारण्यासाठी मिळाल्याने प्रशासनाने आणि राजकीय नेत्यांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.जालना येथील भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हयातील पाणी टंचाईचा आढावा हा जिल्ह्यातील ११० विहिरींमधील पाणी पातळीचा अभ्यास करून घेतला. त्यात यंदा जवळपास सर्वच विहिरींची पाणीपातळी एक मीटरने वाढली आहे.अपवाद केवळ जालना, बदनापूर तसेच मंठा तालुक्यातील काही विहिरींचा देता येईल. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची झळ ही खऱ्या अर्थाने मार्च ते जून या कालावधीत जाणवू शकते आणि ती देखील केवळ ५८ गावांमध्ये ही टंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते, असा अहवाल जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातRainपाऊसWaterपाणी