शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

राँग साईड बैलगाडी ठरली काळ; परीक्षेसाठी दुचाकीवर जाणारा अभियांत्रिकी विद्यार्थी धडकेत ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:12 IST

अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; धुळे ते सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री डाव्या कालव्याजवळील घटना

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : पाटोद्याहून छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षेसाठी जाणाऱ्या अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याचा विरुद्ध दिशेने येणाऱ्या उसाच्या बैलगाडीस दुचाकी धडकल्याने मृत्यू झाला. चैतन्य वैद्यनाथ जायभाये ( २०,  काकडहिरा ता. पाटोदा जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात धुळे ते सोलापूर महामार्गावर आज सकाळी ( दि. ३ ) ७ वाजेच्या दरम्यान वडीगोद्री डाव्या कालव्या जवळ झाला.

पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील चैतन्य वैद्यनाथ जायभाये हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याची छत्रपती संभाजीनगर येथे आज सकाळी साडे अकरा वाजता परीक्षा होती. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी चैतन्य आज पहाटे साडेपाच वाजता काकडहिरा येथील घरून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर ( क्रमांक एम.एच.२३ बी.डी.५०८८) निघाला. सकाळी वडीगोद्री डाव्या कालव्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीसोबत दुचाकीची जोरदार धडक झाली. यात चैतन्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

दुचाकीचा चुराडा झालाउसाची बैलगाडी आणि दुचाकीची जोरदार अपघात झाल्यानंतर चैतन्य गंभीर जखमी झाला. तर दुचाकी चकानाचूर झाली. चुकीच्या दिशेने आलेल्या ऊस टायरगाडीमुळे अपघात होऊन चैतन्यचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी वार्ता समजताच जायभाये कुटुंब व काकडहिरा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना