शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दुष्काळातही प्रशासनाचे चलता हे धोरण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:41 IST

थंडीतही महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचही आमदारांनी त्यांच्या मतदार संघात पाणीटंचाई आढावा बैठका घेतल्या.

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने ग्रामीण भागातील जनता हैराण आहे. पाणीटंचाईने जानेवारीतच रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या आठवड्यात कडाक्याच्या थंडीतही महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचही आमदारांनी त्यांच्या मतदार संघात पाणीटंचाई आढावा बैठका घेतल्या. त्यात प्रशासनाच्या विरोधात सरपंच तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या भावनांचा सार काढल्यास एकूणच पाणीटंचाई, चाराटंचाई तसेच नळ योजनांची दुरूस्ती, विहिर अधिग्रहणाचे गेल्यावर्षीचे पैसे न मिळणे, टँकर सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव पाठवूनही त्यांना तातडीने मंजूरी मिळत नसल्याचे वास्तव आमदारांसमोर मांडले.बदनापूर येथेही गेल्या महिन्यात आ. नारायण कुचे यांनी आढावा बैठक घेतली. त्यांनी तर थेट बैठकीतूनच अधिकाऱ्यांना कारणे विचारून चांगलीच कानउघडणी केली. तसाच अनुभव जालना तसेच भोकरदन येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि आ. संतोष दानवे यांना आला. अनेक अधिकारी हे बैठकीस हजर नसल्याचे दिसून आले. यापूर्वीही पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या मुद्यावर जिल्हा परिषदेत आढावा बैठका पार पडल्या. सर्वसाधारण सभेतही दुष्काळाच्या मुद्यावरून अधिकारी आणि पदाधिका-यांत चांगलीच खडाजंगी झाली होती. जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती पाहता प्रशासनाने आळस झटकून कामाला लागा अशा सक्त सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या होत्या. मात्र, केवळ बैठकीत माना डोलावणारे प्रशासन प्रत्यक्षात किती हलले हा संशोधनाचा विषय आहे. पाणीटंचाई निवारणासाठी ११ कोटी रूपयांचा आराखडा मंजूर केला. त्यातून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नळ योजनांची दुरूस्ती, नवीन नळ योजना घेणे, तसेच अन्य कामांसह टँकरने पाणीपुवठा करण्यासाठी हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे.आज घडीला जिल्ह्यात १२६ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूणच ही टँकरची संख्या चांगला पाऊस पडेपर्यंत थेट ५०० पेक्षा अधिक जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.एकीकडे जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे, ठिबकसाठीचे अनुदान एवढे सर्व करूनही यंदा पावसाने दगा दिल्या सर्व बाबी कुचकामी ठरल्याने दुष्काळाची दाहकता वाढली आहे. यंदाचा दुष्काळ हा खरीप आणि रबी हंगाम पूर्णपणे कुचकामी ठरल्याने त्याच्या झळा तीव्र जाणवत आहे.आजही कृषी विभागात कृषी अधीक्षकांसह अन्य चार महत्वाचे तांत्रिक अधिका-यांची पदे रिक्त आहेत. तर रोजगार हमी योजनेलाही उपजिल्हाधिकारी नाही. आहेत ते अधिकारी एक तर औरंगाबाद किंवा परभणी येथून अपडाऊन करत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.याकडे आता जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिका-यांनीचप्रशासनाला हलविण्याची गरज निर्माण झाली आहे. नसता प्रशासना विरूध्द वातावरण तापण्यास वेळ लागणार नाही, हे वास्तव नाकारून चालणार नाही. प्रशासनाप्रमाणेच लोकप्रतिनिधींनी देखील केवळ आढावा बैठकींचा सोपस्कार पूर्ण करून आता भागणार नाही, तर अधिकारी, कर्मचा-यांकडून किमान दुष्काळात तरी चांगले काम करून घेण्याची गरज आहे.

टॅग्स :droughtदुष्काळGovernmentसरकारwater shortageपाणीटंचाई