शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

दुष्काळातही प्रशासनाचे चलता हे धोरण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:41 IST

थंडीतही महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचही आमदारांनी त्यांच्या मतदार संघात पाणीटंचाई आढावा बैठका घेतल्या.

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने ग्रामीण भागातील जनता हैराण आहे. पाणीटंचाईने जानेवारीतच रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या आठवड्यात कडाक्याच्या थंडीतही महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचही आमदारांनी त्यांच्या मतदार संघात पाणीटंचाई आढावा बैठका घेतल्या. त्यात प्रशासनाच्या विरोधात सरपंच तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या भावनांचा सार काढल्यास एकूणच पाणीटंचाई, चाराटंचाई तसेच नळ योजनांची दुरूस्ती, विहिर अधिग्रहणाचे गेल्यावर्षीचे पैसे न मिळणे, टँकर सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव पाठवूनही त्यांना तातडीने मंजूरी मिळत नसल्याचे वास्तव आमदारांसमोर मांडले.बदनापूर येथेही गेल्या महिन्यात आ. नारायण कुचे यांनी आढावा बैठक घेतली. त्यांनी तर थेट बैठकीतूनच अधिकाऱ्यांना कारणे विचारून चांगलीच कानउघडणी केली. तसाच अनुभव जालना तसेच भोकरदन येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि आ. संतोष दानवे यांना आला. अनेक अधिकारी हे बैठकीस हजर नसल्याचे दिसून आले. यापूर्वीही पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या मुद्यावर जिल्हा परिषदेत आढावा बैठका पार पडल्या. सर्वसाधारण सभेतही दुष्काळाच्या मुद्यावरून अधिकारी आणि पदाधिका-यांत चांगलीच खडाजंगी झाली होती. जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती पाहता प्रशासनाने आळस झटकून कामाला लागा अशा सक्त सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या होत्या. मात्र, केवळ बैठकीत माना डोलावणारे प्रशासन प्रत्यक्षात किती हलले हा संशोधनाचा विषय आहे. पाणीटंचाई निवारणासाठी ११ कोटी रूपयांचा आराखडा मंजूर केला. त्यातून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नळ योजनांची दुरूस्ती, नवीन नळ योजना घेणे, तसेच अन्य कामांसह टँकरने पाणीपुवठा करण्यासाठी हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे.आज घडीला जिल्ह्यात १२६ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूणच ही टँकरची संख्या चांगला पाऊस पडेपर्यंत थेट ५०० पेक्षा अधिक जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.एकीकडे जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे, ठिबकसाठीचे अनुदान एवढे सर्व करूनही यंदा पावसाने दगा दिल्या सर्व बाबी कुचकामी ठरल्याने दुष्काळाची दाहकता वाढली आहे. यंदाचा दुष्काळ हा खरीप आणि रबी हंगाम पूर्णपणे कुचकामी ठरल्याने त्याच्या झळा तीव्र जाणवत आहे.आजही कृषी विभागात कृषी अधीक्षकांसह अन्य चार महत्वाचे तांत्रिक अधिका-यांची पदे रिक्त आहेत. तर रोजगार हमी योजनेलाही उपजिल्हाधिकारी नाही. आहेत ते अधिकारी एक तर औरंगाबाद किंवा परभणी येथून अपडाऊन करत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.याकडे आता जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिका-यांनीचप्रशासनाला हलविण्याची गरज निर्माण झाली आहे. नसता प्रशासना विरूध्द वातावरण तापण्यास वेळ लागणार नाही, हे वास्तव नाकारून चालणार नाही. प्रशासनाप्रमाणेच लोकप्रतिनिधींनी देखील केवळ आढावा बैठकींचा सोपस्कार पूर्ण करून आता भागणार नाही, तर अधिकारी, कर्मचा-यांकडून किमान दुष्काळात तरी चांगले काम करून घेण्याची गरज आहे.

टॅग्स :droughtदुष्काळGovernmentसरकारwater shortageपाणीटंचाई