शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टँकरसाठी तहसीलदारांच्या दालनात महिलांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:12 IST

टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी परतूर तालुक्यातील मसला येथील संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी परतूर तालुक्यातील मसला येथील संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.परतूर तालुक्यातील बहुतांश गावांत सध्या पाणी टंचाई आहे. गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा यासाठी अनेक गावांनी तहसील प्रशासनाकडे प्रस्ताव दिले आहेत. मसला ग्रा.पं. यात समावेश आहे. गावातील शासकीय विहिरी, बोअर आटले आहेत. यामुळे पाण्यासाठी महिलांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. विहिरीवरून आणलेले पाणी गाळयुक्त आणि दूषित असल्याने गावकरी पोटदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊनही प्रशासनाकडून पाणी टंचाई निवारण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने संतप्त महिलांनी थेट तहसील कार्यालय गाठून नायब तहसीलदार सुरेखा कुटूरकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी बाटलीत सोबत आणलेले दूषित पाणी तहसीलदारांच्या टेबलावर ठेवले. तुम्ही बाटलीबंद पाणी पिता, आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या. दोन दिवसांत गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी शांताबाई पाईकराव, सिंधू गिराम, अनूसया राक्षे, मुगाबाई निलेवाड, शारदा गुंजमूर्ती, छबाबाई भदर्गे आदींची उपस्थिती होती.गैरसोय दूर करणारटंचाईग्रस्त गावात टँकरव्दारे पाणी पुरवठ्यावर प्रशासन सकरात्मक आहे. मसला गावासाठी तातडीने टँकर सुरु करण्यात येणार असल्याचे सुरेखा कुटूरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Womenमहिलाagitationआंदोलनwater shortageपाणीटंचाई