शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

टँकरसाठी तहसीलदारांच्या दालनात महिलांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:12 IST

टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी परतूर तालुक्यातील मसला येथील संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी परतूर तालुक्यातील मसला येथील संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.परतूर तालुक्यातील बहुतांश गावांत सध्या पाणी टंचाई आहे. गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा यासाठी अनेक गावांनी तहसील प्रशासनाकडे प्रस्ताव दिले आहेत. मसला ग्रा.पं. यात समावेश आहे. गावातील शासकीय विहिरी, बोअर आटले आहेत. यामुळे पाण्यासाठी महिलांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. विहिरीवरून आणलेले पाणी गाळयुक्त आणि दूषित असल्याने गावकरी पोटदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊनही प्रशासनाकडून पाणी टंचाई निवारण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने संतप्त महिलांनी थेट तहसील कार्यालय गाठून नायब तहसीलदार सुरेखा कुटूरकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी बाटलीत सोबत आणलेले दूषित पाणी तहसीलदारांच्या टेबलावर ठेवले. तुम्ही बाटलीबंद पाणी पिता, आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या. दोन दिवसांत गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी शांताबाई पाईकराव, सिंधू गिराम, अनूसया राक्षे, मुगाबाई निलेवाड, शारदा गुंजमूर्ती, छबाबाई भदर्गे आदींची उपस्थिती होती.गैरसोय दूर करणारटंचाईग्रस्त गावात टँकरव्दारे पाणी पुरवठ्यावर प्रशासन सकरात्मक आहे. मसला गावासाठी तातडीने टँकर सुरु करण्यात येणार असल्याचे सुरेखा कुटूरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Womenमहिलाagitationआंदोलनwater shortageपाणीटंचाई