शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती महिलांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:57 IST

महिलांमध्ये कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती असून ती संधी तिला उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे प्रतिपादन रमाताई आहिरे यांनी येथे बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एका चौकटीच्या आत महिलांनी स्वत:ला गुरफटून घेतले असतांनाच पुरुष प्रधान संस्कृतीने देखील स्त्रीला तिच्या अधिकारापासून वंचित ठेवले आहे. एकीकडे महिला नवनवीन आव्हानांना समोरे जाऊन आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवतांना दिसत असतांना दुसरीकडे मात्र, ती आजही अबलाच असल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता महिलांमध्ये कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती असून ती संधी तिला उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे प्रतिपादन रमाताई आहिरे यांनी येथे बोलताना केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना आहिरे बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, विमल आगलावे, खमर सुलताना, कुसुम रगडे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना आहिरे म्हणाल्या की, घटनेमुळे महिलांना आरक्षण मिळाले असले तरी त्याचा फायदा किती महिलांना झाला? किती महिला शेतकरी आहेत? किती महिला स्वत: उद्योजक आहेत? तर ही संख्या अत्यंत नगण्य अशीच आहे. त्याचे कारण महिलांनी जसे स्वत:ला एका चौकटीत अडकवून ठेवले आहे. तसेच तिला पुरुष प्रधान संस्कृतीने देखील बाहेर पडू दिले नाही. कोणतेही अधिकार तिच्याकडे ठेवले नाहीत. खरे तर महिलांना संविधानाने खूप अधिकार दिलेले आहेत. कायद्याच प्रत्येक कलम माहित नसले तरी किमान स्वसंरक्षणाबाबतीत असलेल्या कायद्याचे ज्ञान तरी महिलांनी आत्मसात केले पाहिजे, असे सांगून रमाताई आहिरे म्हणाल्या की, आज पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. शैक्षणिक आर्थिक दृष्टया आपली परिस्थिती मुळीच वाईट नाही. घरातली प्रत्येक स्त्री किमान दहावी- बारावीपर्यंत शिकलेली आहे. परंतु या शिक्षणाचा तिला फायदा आहे का ? खरे तर महिलांनी स्वत:हून पुढे येऊन घरातील आर्थिक नियोजन आणि अन्य कामातही दखल घेतली पाहिजे. असेही अहिरे म्हणाल्या.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिकWomenमहिला