शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती महिलांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:57 IST

महिलांमध्ये कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती असून ती संधी तिला उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे प्रतिपादन रमाताई आहिरे यांनी येथे बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एका चौकटीच्या आत महिलांनी स्वत:ला गुरफटून घेतले असतांनाच पुरुष प्रधान संस्कृतीने देखील स्त्रीला तिच्या अधिकारापासून वंचित ठेवले आहे. एकीकडे महिला नवनवीन आव्हानांना समोरे जाऊन आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवतांना दिसत असतांना दुसरीकडे मात्र, ती आजही अबलाच असल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता महिलांमध्ये कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती असून ती संधी तिला उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे प्रतिपादन रमाताई आहिरे यांनी येथे बोलताना केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना आहिरे बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, विमल आगलावे, खमर सुलताना, कुसुम रगडे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना आहिरे म्हणाल्या की, घटनेमुळे महिलांना आरक्षण मिळाले असले तरी त्याचा फायदा किती महिलांना झाला? किती महिला शेतकरी आहेत? किती महिला स्वत: उद्योजक आहेत? तर ही संख्या अत्यंत नगण्य अशीच आहे. त्याचे कारण महिलांनी जसे स्वत:ला एका चौकटीत अडकवून ठेवले आहे. तसेच तिला पुरुष प्रधान संस्कृतीने देखील बाहेर पडू दिले नाही. कोणतेही अधिकार तिच्याकडे ठेवले नाहीत. खरे तर महिलांना संविधानाने खूप अधिकार दिलेले आहेत. कायद्याच प्रत्येक कलम माहित नसले तरी किमान स्वसंरक्षणाबाबतीत असलेल्या कायद्याचे ज्ञान तरी महिलांनी आत्मसात केले पाहिजे, असे सांगून रमाताई आहिरे म्हणाल्या की, आज पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. शैक्षणिक आर्थिक दृष्टया आपली परिस्थिती मुळीच वाईट नाही. घरातली प्रत्येक स्त्री किमान दहावी- बारावीपर्यंत शिकलेली आहे. परंतु या शिक्षणाचा तिला फायदा आहे का ? खरे तर महिलांनी स्वत:हून पुढे येऊन घरातील आर्थिक नियोजन आणि अन्य कामातही दखल घेतली पाहिजे. असेही अहिरे म्हणाल्या.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिकWomenमहिला