शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कुटुंब नियोजनात महिलाच पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 00:10 IST

जिल्ह्यातील आकडेवारीवरून महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पुरुष महिला दोघांनाही करता येते, पण जिल्ह्यातील आकडेवारीवरून महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे. यंदा पुरुषांनी उद्दिष्टाच्या तुलनेत अवघ्या ११ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.वाढत्या महागाईत अपत्य एक किंवा दोन यापेक्षा जास्त नकोच, अशी भूमिका आता आधुनिक दाम्पत्यांनी घेतली आहे. यापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी जनजागृती करावी लागली. लोकसंख्या वाढीचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी विशेष कार्यक्रम राबवला जातो. यात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित केले जाते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुरुष किंवा महिला या दोघांपैकी एकाने केली, तरी पाळणा थांबवता येतो. पण पाळणा थांबवण्यासाठी इतरही उपाय केले जातात. परंतु कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कायमस्वरुपी पाळणा थांबवण्यासाठी केली जाते. कुटुंबाच्या तसेच सामाजिक दबावामुळे महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा ५० टक्के कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी अवघ्या ११ पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या आहे. पुरुष नसबंदीसंदर्भात अनेक गैरसमज असल्याने पुरुष कुटुंब नियोजनासाठी धजावत नाहीत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दरवर्षी कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसाठीचे उद्दिष्ट घेऊन काम करतो. हे उद्दिष्ट पूर्ण करताना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांनाही शस्त्रक्रियेसाठी उद्दीष्ट दिले जाते. त्यानुसार दोन अपत्यांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच तांबी बसवून उपाय योजना केल्याचा स्वतंत्र अहवाल आरोग्य विभाग तयार करते. यावर्षी आरोग्य विभागाला ११,३७२ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५६७७ महिलांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत तर केवळ ११ पुरूषांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत.अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखाली असलेल्या महिलांनी शस्त्रक्रिया केल्यास त्यांना शासनातर्फे ६०० रूपये दिले जातात. तसेच इतर महिलांना २५० रूपये दिले जातात. पुरूषांनी शस्त्रक्रिया केल्यास त्यांना १४०० रूपये दिले जातात.

टॅग्स :WomenमहिलाFamilyपरिवारSocialसामाजिकgovernment schemeसरकारी योजना