शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कुटुंब नियोजनात महिलाच पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 00:10 IST

जिल्ह्यातील आकडेवारीवरून महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पुरुष महिला दोघांनाही करता येते, पण जिल्ह्यातील आकडेवारीवरून महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे. यंदा पुरुषांनी उद्दिष्टाच्या तुलनेत अवघ्या ११ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.वाढत्या महागाईत अपत्य एक किंवा दोन यापेक्षा जास्त नकोच, अशी भूमिका आता आधुनिक दाम्पत्यांनी घेतली आहे. यापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी जनजागृती करावी लागली. लोकसंख्या वाढीचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी विशेष कार्यक्रम राबवला जातो. यात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित केले जाते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुरुष किंवा महिला या दोघांपैकी एकाने केली, तरी पाळणा थांबवता येतो. पण पाळणा थांबवण्यासाठी इतरही उपाय केले जातात. परंतु कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कायमस्वरुपी पाळणा थांबवण्यासाठी केली जाते. कुटुंबाच्या तसेच सामाजिक दबावामुळे महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा ५० टक्के कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी अवघ्या ११ पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या आहे. पुरुष नसबंदीसंदर्भात अनेक गैरसमज असल्याने पुरुष कुटुंब नियोजनासाठी धजावत नाहीत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दरवर्षी कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसाठीचे उद्दिष्ट घेऊन काम करतो. हे उद्दिष्ट पूर्ण करताना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांनाही शस्त्रक्रियेसाठी उद्दीष्ट दिले जाते. त्यानुसार दोन अपत्यांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच तांबी बसवून उपाय योजना केल्याचा स्वतंत्र अहवाल आरोग्य विभाग तयार करते. यावर्षी आरोग्य विभागाला ११,३७२ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५६७७ महिलांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत तर केवळ ११ पुरूषांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत.अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखाली असलेल्या महिलांनी शस्त्रक्रिया केल्यास त्यांना शासनातर्फे ६०० रूपये दिले जातात. तसेच इतर महिलांना २५० रूपये दिले जातात. पुरूषांनी शस्त्रक्रिया केल्यास त्यांना १४०० रूपये दिले जातात.

टॅग्स :WomenमहिलाFamilyपरिवारSocialसामाजिकgovernment schemeसरकारी योजना