शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

लागतील तेवढी कागदपत्रे देणार; उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार- मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: September 6, 2023 21:05 IST

निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जालना : निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असा शासनाचा निरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना दिला. शासनाच्या निर्णयावर आपण सहकाऱ्यांसमवेत चर्चा करुन गुरूवारी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाबाबतचा आपला निर्णय जाहीर करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाने घेलेल्या निर्णयाचा निरोप घेऊन आलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर आज दिवसभर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. ज्यांच्या निजामकालीन नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला जाईल यासह इतर मागण्या मान्य केल्या असून, ५० टक्क्यांहून अधिकची लढाई मनोज जरांगे यांनी जिंकली आहे. गुन्हे परत घेण्याबाबत सकारात्मक शब्द मिळाला आहे. शासनाच्या निरोपावर जरांगे सकारात्मक असून, उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करण्याची वेळ जरांगे यांनी दिल्याचे खोतकर म्हणाले. 

राजेश टोपे म्हणाले...यावेळी आ. राजेश टोपे यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती देत शासनाच्या निर्णयावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी आहेत त्यांना उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र देणे, त्याचा तत्काळ जीआर काढणे, सरसकट महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठा समाजबांधवांना एका महिन्यात कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार, मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आदी शासनाच्या निरोपावर सहकाऱ्यांसमवेत चर्चा करून उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत निर्णय घेऊ, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.

लागतील तेवढी कागदपत्रे देणारमनोज जरांगे यांनी शासनाचा निरोप येण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातील मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाला एका दिवसात अध्यादेश काढता येईल इतके पुरावे आपल्याकडे आहेत. निजामकालीन दस्तऐवजासह इतर कायदेशीर कागदपत्रे आहेत. एका कागदावरही हा अध्यादेश काढता येईल. तुम्ही रिक्षा भरून मागा, टिप्पर भरून मागा तितकी कागदपत्रे देतो. तुम्ही यावे, कागदपत्रे न्यावीत. काढलेला अध्यादेश कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी तज्ज्ञांची टीमही देऊ, असे आवाहन उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी शासनाला केले.

मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चापत्रकार परिषद सुरू असताना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करू, असे सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण