शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

लागतील तेवढी कागदपत्रे देणार; उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार- मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: September 6, 2023 21:05 IST

निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जालना : निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असा शासनाचा निरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना दिला. शासनाच्या निर्णयावर आपण सहकाऱ्यांसमवेत चर्चा करुन गुरूवारी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाबाबतचा आपला निर्णय जाहीर करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाने घेलेल्या निर्णयाचा निरोप घेऊन आलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर आज दिवसभर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. ज्यांच्या निजामकालीन नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला जाईल यासह इतर मागण्या मान्य केल्या असून, ५० टक्क्यांहून अधिकची लढाई मनोज जरांगे यांनी जिंकली आहे. गुन्हे परत घेण्याबाबत सकारात्मक शब्द मिळाला आहे. शासनाच्या निरोपावर जरांगे सकारात्मक असून, उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करण्याची वेळ जरांगे यांनी दिल्याचे खोतकर म्हणाले. 

राजेश टोपे म्हणाले...यावेळी आ. राजेश टोपे यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती देत शासनाच्या निर्णयावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी आहेत त्यांना उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र देणे, त्याचा तत्काळ जीआर काढणे, सरसकट महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठा समाजबांधवांना एका महिन्यात कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार, मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आदी शासनाच्या निरोपावर सहकाऱ्यांसमवेत चर्चा करून उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत निर्णय घेऊ, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.

लागतील तेवढी कागदपत्रे देणारमनोज जरांगे यांनी शासनाचा निरोप येण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातील मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाला एका दिवसात अध्यादेश काढता येईल इतके पुरावे आपल्याकडे आहेत. निजामकालीन दस्तऐवजासह इतर कायदेशीर कागदपत्रे आहेत. एका कागदावरही हा अध्यादेश काढता येईल. तुम्ही रिक्षा भरून मागा, टिप्पर भरून मागा तितकी कागदपत्रे देतो. तुम्ही यावे, कागदपत्रे न्यावीत. काढलेला अध्यादेश कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी तज्ज्ञांची टीमही देऊ, असे आवाहन उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी शासनाला केले.

मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चापत्रकार परिषद सुरू असताना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करू, असे सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण