शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
2
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
3
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
4
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
5
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
6
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
7
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
8
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
9
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
10
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
11
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
12
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
13
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
14
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
15
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
16
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
17
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
18
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
19
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
20
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

नागरी समस्यांचा पोळा कोण फोडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:26 IST

काळ्या आईला हिरवा शालू पांघरता यावा म्हणून सर्जा-राजा हे वर्षभर राबराब राबतात या राबणाऱ्या बैलांनाही एक दिवस पोळा सणाच्या निमित्ताने सन्मान देण्यात येतो. त्यांच्यासाठी वर्षातून एकदाच पुरणपोळी केली जाते, त्यांची सजवून मिरवणूक काढण्यात येते. एरवी नेहमी चाबकाचे फटकारे खात ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता आपल्या बळीराजासाठी तो राबराब राबतो. त्याचा सन्मान होत असल्याने भारतीय संस्कृती किती महान आहे, हेच या पोळा सणातून दिसून येते.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काळ्या आईला हिरवा शालू पांघरता यावा म्हणून सर्जा-राजा हे वर्षभर राबराब राबतात या राबणाऱ्या बैलांनाही एक दिवस पोळा सणाच्या निमित्ताने सन्मान देण्यात येतो. त्यांच्यासाठी वर्षातून एकदाच पुरणपोळी केली जाते, त्यांची सजवून मिरवणूक काढण्यात येते. एरवी नेहमी चाबकाचे फटकारे खात ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता आपल्या बळीराजासाठी तो राबराब राबतो. त्याचा सन्मान होत असल्याने भारतीय संस्कृती किती महान आहे, हेच या पोळा सणातून दिसून येते.गावातील सर्व सजविलेल्या बैलांना हनुमान मंदिरा समोर आणून त्यांची सार्वजनिक पूजा केली जाते आणि नारळ फोडून पोळा फुटला असे जाहीर केले जाते. नंतर धन्याच्या घरी बैलांचे औक्षवण केले जाते. आता तुम्ही म्हणाल पोळा सणाचा आणि जालना शहरातील नागरी समस्यांचा संबंध कसा काय जोडता, पोळा या एकाच सणासाठी फुटला हा शब्दप्रयोग केला जातो.तर दुसरे म्हणजे दहीहंडी फुटली असे उच्चारले जाते. हे दोन्ही जवळपास जोडून येतात. त्यामुळे सणाशी नाते जोडले ते जालन्यातील नागरी समस्यांचे या सुटता सुटेनात आणि फुटेनातही अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेले जालना शहर गेल्या पाच वर्षापासून पथदिवे बंद असल्याने अंधारात चाचपडते आहे. गणेश उत्सव, रमजान इद, दिवाळी असे काही सण आल्यावर हे पथदिवे सुरू होतात आणि नंतर पुन्हा जैसे थे. पथदिव्यांप्रमाणेच घनकचरा प्रकल्पाचे झाले आहे. स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या पहिल्या आढावा बैठकीत तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण न झाल्यास संबंधित कंपनीविरूध्द गुन्हे दाखल केले जातील अशी घोषणा केली होती. मात्र याला आता साडेतीनवर्ष झाले आहेत. पाणीपुरवठ्याची सध्या ऐन पावसाळ्यातही शहराच्या काही भागात दहा ते पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे. या तीन्ही समस्या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. आणि आता या समस्या सोडविण्याची जबाबादी ही पालिकेची असून, संपूर्ण राज्यात सर्वात जास्त मतांनी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांना जालनेकरांनी निवडून दिले आहे. त्यांच्याकडून आता मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या पातळीवर त्या प्रयत्न करत असल्याचे दिसत असले तरी, त्यात आणखी वाढ करण्याची गरज जनतेतून व्यक्त होत आहे. विरोधी पक्ष असलेले शिवसेना आणि भाजप हे सर्वसाधारण सभेत त्यांच्याशी संबंधित मुद्यांवर थोडाफार गोंधळ करून जोर आजमायीश करतात परंतू नंतर विविध प्रकारच्या विकास कामांवरून सर्वपक्षीयांचे हातात-हात घालून सर्वकाही आलबेल सुरू असल्याचे दर्शन घडते.एकूणच विरोधी पक्ष केवळ खासगीत चर्चा करताना आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देऊन मन हलके करतात. परंतु प्रत्यक्षात कोणीच कोणाविरूध्द दोन हात करण्याच्या स्थितीत नसते. राहिला गरीब बिचा-या जनतेचा मुद्दा ती रोजजच्याच आपल्या राहाटगाडग्यातून त्यांना उसंत मिळत नाही. त्यामुळे ना या शहरात आंदोलन होत ना कोणी पेटून उठत. त्यामुळे राजकारणी आणि प्रशासनाचे चांगलेच फावते. चलता है...आणि समस्या हा प्रश्न न संपणारा असतो, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने कोणाचीच भीती अथवा दबावगट नसल्याने जालनेकरांच्या समस्यांचा पोळा फोडणार कोण असा प्रश्न अनुत्तरित राहतो.त्यामुळे मग जालनेकरांचे जगने म्हणजे ठेवीले अनंत तैसेची राहावे या संत वचनाप्रमाणे बनले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcivic issueनागरी समस्या