शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

सरसकट पंचनामे सारखे नुकसान दिसत नाही, परंतु सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 18:22 IST

पिक विमा कंपन्यांना यामध्ये जोडण्यात येणार असून लवकरच संयुक्त पंचनामे करण्यात येतील

बदनापूर ( जालना) : पावसाने झालेल्या नुकसानीचे येत्या पंधरा दिवसात पंचनामे होतील. त्यानंतर मदतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. सरसकट पंचनामे सारखे नुकसान दिसत नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले

अतिवृष्टी झालेल्या बदनापूर तालुक्यातील अंबडगाव शिवारात आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट दिली. येथे दत्तू रावसाहेब गोजे या शेतकऱ्याच्या गट क्रमांक 53 मध्ये नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की,  गेल्या चार वर्षांपासून या भागात नेहमीच अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याचे कारण शोधण्यासाठी एका समितीची गरज आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे वेगवेगळे भाग आहेत. तरीही ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे पंधरा दिवसापर्यंत करण्यात येतील. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत निर्णय घेतील. सरसकट पंचनामे सारखे नुकसान दिसत नाही परंतु नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय व मदत निश्चित मिळेल.  फळबागांचे सुद्धा पंचनामे होतील. पिक विमा कंपन्यांना यामध्ये जोडण्यात येणार असून लवकरच संयुक्त पंचनामे करण्यात येतील, असे आश्वासन सत्तार यांनी दिले.

यावेळी माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, खोतकर राजेश, महादू जऱ्हाड, गीते निवृत्ती, डाके नंदकिशोर, दाभाडे श्रीरंग, जऱ्हाड ताराचंद, फुलमाळी शिवाजी, जऱ्हाड भगवान, म्हात्रे संतोष, वरकड बाबुराव, मिर्झा शेख अजीज, कोल्हे जगदीश आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी अंबडगाव, धोपटेश्वर, देवगाव कस्तुरवाडी व रोशनगाव मंडळातील पिकांची हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये फळबाग, कापूस, सोयाबीन, तूर अशा अनेक पिकांचे नुकसान झाले असून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन कृषिमंत्र्यांना दिले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारagricultureशेतीRainपाऊसJalanaजालना