शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जागेच्या नोंदीसाठी लाच घेतांना ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:56 IST

मागील वीस दिवसांमध्ये जिल्ह्यातील तीन ग्रामसेवकांना लाच लुचपत विभागाने पकडले आहे.

जालना : नमुना नंबर ८ मध्ये नोंद करण्यासाठी जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथील ग्रामसेविकेस १२ हजारांची लाच घेतांना लाच लुचपत विभागाने मंगळवारी (दि.२८ ) पकडले. मंजुषा गोविंद जगधने (३२, रा. रामनगर पोलीस कॉलनी जालना) असे ग्रामसेविकेचे नाव आहे. दरम्यान, मागील वीस दिवसांमध्ये जिल्ह्यातील तीन ग्रामसेवकांना लाच लुचपत विभागाने पकडले आहे.

तक्रारदारांनी जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथे १९२० चौरस फुटाची जागा नोटरीद्वारे खरेदी केलेली होती. सदर जागा नावे करण्यासाठी व नमूद जागेची ग्रामपंचायतला नोंद घेवून तसा नमुना नंबर ८ चा उतारा देण्यासाठी तक्रारदारांनी ग्रामसेविका जगधने यांच्याकडे कागदपत्रे देऊन त्यांना नमुना नंबर ८ मध्ये नोंद घेण्यासाठी विचारणा केली असता, त्यावेळी ग्रामसेविका जगधने यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली.  ८ मे रोजी ग्रामसेविका जगधने यांच्या राहत्या घरी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, ग्रामसेविका जगधने व खाजगी इसम कांता टोपे यांनी पंचासमक्ष तडजोडअंती १२ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक रविंद्र निकाळजे, पोनि. काशिद, पोनि. व्हि. एल. चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, आत्माराम डोईफोडे, गंभीर पाटील, महेंद्र  सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, सचिन राऊत यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागJalanaजालनाPoliceपोलिस