शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पिकेच काय, जमीन पण वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:57 IST

 पूर्णा, धामणा, केळणाचा प्रथमच पाहिला रुद्रावतार

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान 

- प्रकाश मिरगे

जाफराबाद (जि. जालना) : ज्या पावसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, त्या पावसाचा यंदा कहर झाला. अतिवृष्टीमुळे पूर्णा, धामणा, केळणा नद्यांचा रुद्रावतार प्रथमच पाहिला. नदीच्या पुरात पिकेच काय आमच्या जमिनीही वाहून गेल्या. शासन तुटपुंजी मदत करेल; पण अस्मानी संकटात आमचे झालेले नुकसान भरून निघेल का? असा प्रश्न जाफराबाद तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

जाफराबाद तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे बाजरी, मका, कपाशी, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांची बैठक घेऊन दिले. तालुक्यातील १०१ गावांपैकी ४४ गावात पंचनामे झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित दोन दिवसात ५७ गावांचे पंचनामे पूर्ण करणार असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. 

नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जाफराबाद शिवारातील शेतीची पाहणी केली असता विदारक चित्र दिसून आले. अतिवृष्टीमुळे पूर्णा-धामना, केळणा नदीला पूर आला होता. या पुरात पिकासह जमीन वाहून गेली. या अस्मानी संकटाचा कहर बोरखेडी गायकी, सावंगी, टाकली, जाफराबाद, खामखेडा, नळविहरा, निमखेडा, पिंपळखुटा, देऊळझरी येथे पाहावयास मिळाला. 

सर्जेराव वरगणे, सय्यद अब्बास, फकिरबा वरगणे, सय्यद युसूफ, उषा वरगणे, बोरखेडी गायके येथील पंढरीनाथ शामराव गायके आदी शेतकऱ्यांची पिकेच नव्हे तर जमीनही या पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करताना जमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना अधिकची मदत करावी, अशी मागणी शामराव गायके यांनी केली आहे.

४४ गावांतील पंचनामेतालुक्यातील १०१ गावातील ५८ हजार ८०९ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. आजवर ४४ गावांतील पंचनामे पूर्ण झाले. यात ३० हजार ५८१ हे. क्षेत्रातील २३ हजार ३८६ शेतकऱ्यांना ३३ टक्क्यांपेक्षा अधिक फटका बसला आहे. उर्वरित ५७ गावांतील पंचनामे करण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण होणार असून, अंतिम अहवाल त्यानंतर समोर येईल. -सतीश सोनी, तहसीलदार जाफराबाद

घास हिरावून घेतलाशेतकऱ्यांनी केलेला खर्च पाण्यात गेला असून, तोंडचा घास हिरावून घेतल्याने दिवाळीसुद्धा साजरी करता आली नाही. त्यामुळे शासनाने सरसगट जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, जमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करावी.  - कृष्णा मोरे, शेतकरी, नळविहरा

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस