शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू’; अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून जरांगेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:25 IST

सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे मांडणार; शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे

वडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला थेट इशारा दिला आहे. "शेतकऱ्यांना तात्काळ मदत आणि आधार द्या, अन्यथा त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करू," असे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. अंबड तालुक्यातील महाकाळा शिवारात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

९ एकर तूर पाण्याखालीसोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महाकाळा शिवारातील शेतकरी सोमनाथ लहाने यांच्या गट नंबर २२ मधील शेतात मोठे नुकसान झाले आहे. जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्याने लावलेली तब्बल ९ एकर तूर पाण्यात पूर्णपणे बुडाली असून, शेतातून खाली उतरणेही शक्य होत नाही, असे भयानक चित्र त्यांनी पाहिले. "शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे," असे सांगत जरांगे पाटील यांनी सरकारला जागे केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माहिती देणारया नुकसानीबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्र्यांना माहिती देणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. "मी सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे मांडणार आहे. सरकार जर याकडे दुर्लक्ष करेल तर त्यांच्यासाठी आपण शांत बसणार नाही, रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारू," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी