शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

धान्य वाटपाचा प्रश्न लागला मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:23 IST

जालना तालुक्यातील शेतकरी धान्य योजनेचा प्रश्न मार्गी लागला असून, याचा ३५ हजार ४११ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी धान्य योजनेंतर्गत एप्रिल महिन्याचे नियतन प्राप्त झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चर्चा केली. या चर्चेनंतर जालना तालुक्यातील शेतकरी धान्य योजनेचा प्रश्न मार्गी लागला असून, याचा ३५ हजार ४११ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. प्रत्येकी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या घोषणेनुसार येत्या तीन महिन्यांचे अतिरिक्त धान्य देखील लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती आ. गोरंट्याल यांनी दिली.राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील एपीएल अंतर्गत गरीब शेतकरी कुटुंबांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. परंतु, सदर योजनेंतर्गत मार्च महिना संपत आलेला असतानाही राज्य शासनाकडून धान्य प्राप्त झाले नव्हते. सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब कुटुंबाच्या अन्न धान्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी थेट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी शुक्रवारी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शेतकरी कुटुंब योजनेंतर्गत धान्याच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर शेतकरी कुटुंब योजनेंतर्गत एप्रिल महिन्याचे देय असलेले धान्याचे नियतन तातडीने करण्याचे आदेश देण्याची ग्वाही भुजबळ यांनी दिली.आ. गोरंट्याल यांच्या पाठपुराव्यामुळे जालना तालुक्यातील सुमारे ३५ हजार ४११ शेतकरी लाभार्थ्यांना धान्य वाटपाचा प्रश्न मार्गी लागला असून, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर येत्या तीन महिन्यासाठी अतिरिक्त धान्य वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. सदर धान्य देखील लवकरच संबंधित लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही आ. गोरंट्याल यांनी दिली आहे.दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील आगामी तीन महिन्यांसाठीचे अन्नधान्य वाटपाचे नियोजन केले जात आहे. यामुळे नागरिकांनी अन्नधान्य मिळणार नाही, याची भीती न बाळगता अतिरिक्त साठा करू नये, असेही गोरंट्याल म्हणाले.शिधापत्रिकेसाठी तहसील कार्यालयाशी संपर्क साधाराज्य शासनाने राज्यातील गोरगरीब कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून माफक दरात गहू, तांदूळ व इतर जीवनावश्यक वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक कुटुंबांकडे शिधापत्रिका उपलब्ध नसल्याने असे कुटुंब शासनाच्या या योजनेपासून वंचित राहत आहेत. अशा सर्व कुटुंब प्रमुखांनी जालना तहसील कार्यालयाशी संपर्क साधून शिधापत्रिका आॅनलाईन करुन घ्याव्यात, जेणे करुन सदर कुटुंबांना देखील स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.दरम्यान, आ. कैलास गोरंट्याल यांनी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्यासमवेत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दिल्या जाणा-या लाभासंदर्भात देखील चर्चा केली. प्राप्त नियतनानुसार ग्रामीण भागात लोकसंख्येच्या प्रमाणात ७६ टक्के तर शहरी भागात ४६ टक्के या रेषोप्रमाणे धान्य वाटपाचे शासनाचे आदेश आहेत.शासनाने निश्चित केलेल्या शहरी भागातील या रेषेमध्ये बदल केल्यास शहरातील गरीब कुटुंबातील लोकांना शासनाच्या धान्य वाटप योजनेचा अधिक प्रमाणात लाभ होण्यास मदत होईल, याकडेही आ. गोरंट्याल यांनी भुजबळ यांचे लक्ष वेधले. या संदर्भात शासन स्तरावरुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाMLAआमदार