शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

स्वखर्चाने मंदिर, मशिद, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:30 IST

पाणी प्यायल्यानंतर जेव्हा हरण, काळवीटसह अन्य प्राणी उड्या मारत पळतात तो क्षण माझ्या मनाला मोठा आनंद देतो असे, वन्य प्राण्यांचा जीवनदाता म्हणून ओळख निर्माण झालेले अली बीन सईद चाऊस यांनी सांगितले.

गजानन वानखडे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनुष्याला तहान लागली तर तो कोणाला आवाज देऊन पाणी मागू शकतो, परंतु मुक्या जनावरांना तहान लागल्यास ते कोणाला पाणी मागणार, हाच विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. यामुळे २००२ पासून वन्य प्राण्यांची पाण्याविना होणारी गैरसोय थांबविण्यासाठी मी औद्योगिक परिसरात वन्य प्राण्यांना पाणी पिता येईल, असा खड्डा तयार केला आणि त्यात टँकरचे पाणी टाकून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली. पाणी प्यायल्यानंतर जेव्हा हरण, काळवीटसह अन्य प्राणी उड्या मारत पळतात तो क्षण माझ्या मनाला मोठा आनंद देतो असे, वन्य प्राण्यांचा जीवनदाता म्हणून ओळख निर्माण झालेले अली बीन सईद चाऊस यांनी सांगितले.जूना जालना परिसरात राहणारे ५३ वर्षीय अली चाऊस यांची परिस्थिती बेताचीच आहे. औद्योगिक वसाहतीतील वेगवेगळ्या कंपन्यांना ते टँकरने पाणीपुरवठा करतात. यातून सहा ते सात हजार रुपये मिळतात.यातील दोन ते अडीच हजार रुपयांचे पाणी खरेदी करुन ते वन्य प्राण्यांची तहान भागवितात. यासाठी त्यांनी औद्योगिक परिसरात असलेल्या वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांना पाणी पिता येईल असा खड्डा खोदून त्यात प्लास्टिकची पन्नी टाकून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली आहे.गेल्या २१ वर्षापासून हे काम अविरत करत असल्याने यातून एक वेगळाच आनंद मिळतो, असे अली चाऊस म्हणाले.बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. त्यामुळेच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांसह वन्य प्राण्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत चाऊस यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचा -हास थांबविण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करण्याचे गरज असल्याचे ते चाऊस म्हणाले. यात माझ्या कुटुंबियांनी सुध्दा मला या कामासाठी नेहमीच सहकार्य करत असल्याने मला हे काम करण्यास बळ मिळते.नागरिकांसाठी पाण्याची मोफत सोयअली चाऊस हे शहरातील नागरिकांना मोफत टँकरचे मोफत पाणी वाटप करतात. यामध्ये शनिमंदिर, इंदिरानगर, चंदनझिरा, इतवारा गल्ली, गणपती गल्ली आदी परिसरातील नागरिकांची तहान भागवितात. याबाबत अली चाऊस यांना विचारले असता. औद्योगिक परिसरात टँकरने पाणी विकून कमाविलेल्या पैशातून अडीच हजार रुपयांचे पाणी मंठा चौफुली परिसरातून विकत घेऊन शहरातील गरजवंत, मंदिर, मशिद तसेच लग्नसमारंभाला मोफत देतो. पाणी मिळाल्याचा नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला सुध्दा आनंद होत असल्याचे अली चाऊस यांनी सांगितले. जोपर्यंत माझे हातपाय चालेल तोपर्यत हे कार्य अविरत चालू ठेवणार आहे. मोफत पाणी वाटप करुन अली यांनी एक आदर्श निर्माण केला.

टॅग्स :SocialसामाजिकWaterपाणीwildlifeवन्यजीव