शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जालना जिल्ह्यात ८२ गावांना ११६ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:48 IST

जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हिवाळ््यातच जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई भासत असून, जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर भोकरदन शहर व तालुक्यात ५९ तर, जाफराबादमध्ये ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जिल्ह्यात यंदा दुष्काळ दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या दुष्काळी परिस्थितीत तहानलेल्या जनतेला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ११६ टँकर सुरू आहेत. टंचाईस्थिती तीव्र होणार असून दोन महिन्यानंतर जिल्ह्यात हजारो टँकरच्या खेपा करून पाणी पुरवठा करावा लागणार आहे.जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात या वर्षी अत्यल्पच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके आली नाहीत व रबीची पेरणी झाली नाही. जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली आहे. पावसाळ्याचे चार महिने कोरडे गेले असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. येत्या काळात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ११६ टँकर सुरू आहेत. तर जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भोकरदन शहरात २०, तर तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जाफराबाद तालुक्यात ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहेत.पाणीपुरवठा करण्याचे आव्हानकाही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत प्रशासनाची आढावा बैठक घेतली. तेव्हा त्यांनी टंचाईस्थितीचा आढावा घेतला होता. जिल्ह्यात आगामी काळात जास्त अंतरावरून पाणीपुरवठा करावा लागेल, असे सांगून त्यांनी प्रशासनास कामाला लावले. जिल्ह्यात जरी सध्या ११६ टँकर सुरू असले, तरी फेब्रुवारी, मार्चमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार मार्चनंतर जिल्ह्यातील ९०८ गावांत पाणी पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ