शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जालना जिल्ह्यात ८२ गावांना ११६ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:48 IST

जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हिवाळ््यातच जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई भासत असून, जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर भोकरदन शहर व तालुक्यात ५९ तर, जाफराबादमध्ये ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जिल्ह्यात यंदा दुष्काळ दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या दुष्काळी परिस्थितीत तहानलेल्या जनतेला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ११६ टँकर सुरू आहेत. टंचाईस्थिती तीव्र होणार असून दोन महिन्यानंतर जिल्ह्यात हजारो टँकरच्या खेपा करून पाणी पुरवठा करावा लागणार आहे.जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात या वर्षी अत्यल्पच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके आली नाहीत व रबीची पेरणी झाली नाही. जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली आहे. पावसाळ्याचे चार महिने कोरडे गेले असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. येत्या काळात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ११६ टँकर सुरू आहेत. तर जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भोकरदन शहरात २०, तर तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जाफराबाद तालुक्यात ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहेत.पाणीपुरवठा करण्याचे आव्हानकाही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत प्रशासनाची आढावा बैठक घेतली. तेव्हा त्यांनी टंचाईस्थितीचा आढावा घेतला होता. जिल्ह्यात आगामी काळात जास्त अंतरावरून पाणीपुरवठा करावा लागेल, असे सांगून त्यांनी प्रशासनास कामाला लावले. जिल्ह्यात जरी सध्या ११६ टँकर सुरू असले, तरी फेब्रुवारी, मार्चमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार मार्चनंतर जिल्ह्यातील ९०८ गावांत पाणी पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ