शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

जालना जिल्ह्यात ८२ गावांना ११६ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:48 IST

जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हिवाळ््यातच जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई भासत असून, जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर भोकरदन शहर व तालुक्यात ५९ तर, जाफराबादमध्ये ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जिल्ह्यात यंदा दुष्काळ दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या दुष्काळी परिस्थितीत तहानलेल्या जनतेला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ११६ टँकर सुरू आहेत. टंचाईस्थिती तीव्र होणार असून दोन महिन्यानंतर जिल्ह्यात हजारो टँकरच्या खेपा करून पाणी पुरवठा करावा लागणार आहे.जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात या वर्षी अत्यल्पच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके आली नाहीत व रबीची पेरणी झाली नाही. जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली आहे. पावसाळ्याचे चार महिने कोरडे गेले असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. येत्या काळात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ११६ टँकर सुरू आहेत. तर जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भोकरदन शहरात २०, तर तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जाफराबाद तालुक्यात ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहेत.पाणीपुरवठा करण्याचे आव्हानकाही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत प्रशासनाची आढावा बैठक घेतली. तेव्हा त्यांनी टंचाईस्थितीचा आढावा घेतला होता. जिल्ह्यात आगामी काळात जास्त अंतरावरून पाणीपुरवठा करावा लागेल, असे सांगून त्यांनी प्रशासनास कामाला लावले. जिल्ह्यात जरी सध्या ११६ टँकर सुरू असले, तरी फेब्रुवारी, मार्चमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार मार्चनंतर जिल्ह्यातील ९०८ गावांत पाणी पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ