शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जलाशयातील पाणीपातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:33 IST

जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय भरलीच नव्हती. परंतु जे काही थोडेफार पाणी होते ते देखील आता आटू लागले आहे. हे पाणी आटण्यामागे कमी पावसासह बाष्पीभवन हा ही एक मोठा घटक असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय भरलीच नव्हती. परंतु जे काही थोडेफार पाणी होते ते देखील आता आटू लागले आहे. हे पाणी आटण्यामागे कमी पावसासह बाष्पीभवन हा ही एक मोठा घटक असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस पडला. गेल्या दोन वर्षामध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावल्याने जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा झालाच नाही. मध्यंतरी राज्य सरकारच्या वतीने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. परंतु त्यातही जी कामे तांत्रिक पद्धतीने दर्जेदार व्हायला हवी होती, ती न झाल्याने देखील जलयुक्त शिवार योजना पाहिजे तेवढी प्रभावी ठरली नाही.जलयुक्त शिवार योजना राबविताना गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास सात ते आठ वेळा नवीन अध्यादेश काढून त्यात सततचे बदल करत गेल्याने दरवर्षी नवीन पद्धतीने कामे करावी लागत असल्याने ग्रामस्थ आणि अधिकारी वैतागले होते. त्यातच यंदा पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे यंदाचा दुष्काळ आणखी तीव्र होणार आहे. आज घडीला जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात ही टँकरची आणखी वाढणार आहे. तर टँकर भरण्यासाठी पाण्याचे नवीन स्त्रोत प्रशासनाला शोधावे लागणार आहेत.जालना शहर व परिसरात विशेष करून जुना जालना भागामध्ये मोती तलाव आणि मुक्तेश्वर तलाव हे दोन पाण्याचे मोठे स्त्रोत आहेत. परंतु यातील पाणीपातळी आता झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम परिसरातील पशुधनाला बसणार आहे. जुना जालना भागामध्ये चारा छावणी तसेच पाणी पुरवठा करून जनावरांसाठी स्वतंत्र हौद बांधण्याची मागणी यापूर्वीच पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे लाड गवळी समाजाचे अध्यक्ष गणेश सुपारकर तसेच परिसरातील पशुपालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ