शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जलाशयातील पाणीपातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:33 IST

जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय भरलीच नव्हती. परंतु जे काही थोडेफार पाणी होते ते देखील आता आटू लागले आहे. हे पाणी आटण्यामागे कमी पावसासह बाष्पीभवन हा ही एक मोठा घटक असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय भरलीच नव्हती. परंतु जे काही थोडेफार पाणी होते ते देखील आता आटू लागले आहे. हे पाणी आटण्यामागे कमी पावसासह बाष्पीभवन हा ही एक मोठा घटक असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस पडला. गेल्या दोन वर्षामध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावल्याने जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा झालाच नाही. मध्यंतरी राज्य सरकारच्या वतीने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. परंतु त्यातही जी कामे तांत्रिक पद्धतीने दर्जेदार व्हायला हवी होती, ती न झाल्याने देखील जलयुक्त शिवार योजना पाहिजे तेवढी प्रभावी ठरली नाही.जलयुक्त शिवार योजना राबविताना गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास सात ते आठ वेळा नवीन अध्यादेश काढून त्यात सततचे बदल करत गेल्याने दरवर्षी नवीन पद्धतीने कामे करावी लागत असल्याने ग्रामस्थ आणि अधिकारी वैतागले होते. त्यातच यंदा पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे यंदाचा दुष्काळ आणखी तीव्र होणार आहे. आज घडीला जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात ही टँकरची आणखी वाढणार आहे. तर टँकर भरण्यासाठी पाण्याचे नवीन स्त्रोत प्रशासनाला शोधावे लागणार आहेत.जालना शहर व परिसरात विशेष करून जुना जालना भागामध्ये मोती तलाव आणि मुक्तेश्वर तलाव हे दोन पाण्याचे मोठे स्त्रोत आहेत. परंतु यातील पाणीपातळी आता झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम परिसरातील पशुधनाला बसणार आहे. जुना जालना भागामध्ये चारा छावणी तसेच पाणी पुरवठा करून जनावरांसाठी स्वतंत्र हौद बांधण्याची मागणी यापूर्वीच पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे लाड गवळी समाजाचे अध्यक्ष गणेश सुपारकर तसेच परिसरातील पशुपालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ