शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जलाशयातील पाणीपातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:33 IST

जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय भरलीच नव्हती. परंतु जे काही थोडेफार पाणी होते ते देखील आता आटू लागले आहे. हे पाणी आटण्यामागे कमी पावसासह बाष्पीभवन हा ही एक मोठा घटक असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय भरलीच नव्हती. परंतु जे काही थोडेफार पाणी होते ते देखील आता आटू लागले आहे. हे पाणी आटण्यामागे कमी पावसासह बाष्पीभवन हा ही एक मोठा घटक असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस पडला. गेल्या दोन वर्षामध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावल्याने जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा झालाच नाही. मध्यंतरी राज्य सरकारच्या वतीने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. परंतु त्यातही जी कामे तांत्रिक पद्धतीने दर्जेदार व्हायला हवी होती, ती न झाल्याने देखील जलयुक्त शिवार योजना पाहिजे तेवढी प्रभावी ठरली नाही.जलयुक्त शिवार योजना राबविताना गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास सात ते आठ वेळा नवीन अध्यादेश काढून त्यात सततचे बदल करत गेल्याने दरवर्षी नवीन पद्धतीने कामे करावी लागत असल्याने ग्रामस्थ आणि अधिकारी वैतागले होते. त्यातच यंदा पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे यंदाचा दुष्काळ आणखी तीव्र होणार आहे. आज घडीला जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात ही टँकरची आणखी वाढणार आहे. तर टँकर भरण्यासाठी पाण्याचे नवीन स्त्रोत प्रशासनाला शोधावे लागणार आहेत.जालना शहर व परिसरात विशेष करून जुना जालना भागामध्ये मोती तलाव आणि मुक्तेश्वर तलाव हे दोन पाण्याचे मोठे स्त्रोत आहेत. परंतु यातील पाणीपातळी आता झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम परिसरातील पशुधनाला बसणार आहे. जुना जालना भागामध्ये चारा छावणी तसेच पाणी पुरवठा करून जनावरांसाठी स्वतंत्र हौद बांधण्याची मागणी यापूर्वीच पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे लाड गवळी समाजाचे अध्यक्ष गणेश सुपारकर तसेच परिसरातील पशुपालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ