शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातील पाणी जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:52 IST

जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला असून, प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला असून, प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी अंबड तालुक्यातील वडीगोद्रीसह इतर गावांमधील कॅनॉलमध्ये सोमवारी दाखल झाले. कॅनॉलला पाणी आल्याने या भागातील हजारो हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून, दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जालना जिल्ह्यात यंदा अपेक्षित असा मोठा पाऊस झालेला नाही. अंबड व घनसावंगी तालुक्यातही परिस्थिती तशीच आहे. पावसाअभावी काही ठिकाणी खरिपाची दुबार पेरणी झाली. गत काही दिवसांमध्ये पडलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. परंतु फळबाग व ऊस पिकासाठी अधिक पावसाची गरज आहे. गोदाकाठच्या गावात आजही जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तीव्र असून, गावा-गावातील पाणीटंचाईही कायम आहे. जायकवाडी जलाशयातून शेतीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक व अहमदनगर परिसरात मोठया प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे मराठवाडयासाठी जीवनदायिनी असलेला जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. पाणी दाखल झाल्याने शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.या गावच्या शिवारात पाणीअंबड तालुक्यातील भांबेरी, दह्याला, नालेगाव, अंतरवाली, सराटी, वडीगोद्री, आपेगाव, बळेगाव, साष्ट पिंपळगाव, चुर्मापुरी, महाकाळा, पाथरवाला खुर्द, बुद्रूक, घुंगर्डे हादगाव, करंजला, पिठोरी शिरसगाव, एकलहेरा, तीर्थपुरी, भारडी आदी गावांना डाव्या कालवा व त्याच्या वितरिकांमार्फत पाणीपुरवठा केला जातो.या गावांच्या शिवारातील लाखो हेक्टरवरील पिकांना या पाण्याचा लाभ होणार आहे. शिवाय जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे.मोठ्या पावसाची प्रतीक्षादमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ठणठणाट कायम असून, इतर जलस्त्रोतांची अवस्थाही बिकट आहे. पाणीप्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमआहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र