शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सत्तेत असताना इव्हीएम विश्वसनीय होते का?- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:55 IST

इव्हीएममध्ये विरोधकांना दोष कसा दिसतो, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अंबड येथे आयोजित जाहीर सभेत केला

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : केंद्रासह महाराष्ट्रात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने दहा वर्षे सत्ता भोगली. त्यावेळच्या निवडणुका या देखील इव्हीएमवरच झाल्या होत्या. त्यामुळे इव्हीएम चांगले होते आणि आता आम्हाला जनता विजयी करत आहे, तर इव्हीएममध्ये विरोधकांना दोष कसा दिसतो, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अंबड येथे आयोजित जाहीर सभेत केला. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा वर्ष आणि आमचे पाच वर्ष या काळातील जो विकास आम्ही केला त्यावर खुली चर्चा झाल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल, असे आव्हानही विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी दिले.अंबड येथील दत्ताजी भाले मैदानावर महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, भाजपाचे उपप्रदेशाध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर, आ. नारायण कुचे, नगराध्यक्षा संगीता कुचे, शीतल कुचे, जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंग ठाकूर, शहराध्यक्ष संदीप खरात, नगरसेवक सौरभ कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आघाडी सरकारने केवळ २० हजार कोटी रूपये देऊ केले होते. ते आम्ही ५० हजार कोटी रूपये दिले. यासह दुष्काळी अनुदान, बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान इ. मदत ही वेगळी असे त्यांनी नमूद केले. मराठवाड्याच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला आहे, तो भविष्यात भूतकाळ होईल, असे सांगून सिंचन, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य मिटविणयसाठी वॉटरग्रीड प्रकल्पासाठी २० हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. तसेच समुद्राचे १६७ टीमएमसी पाणी गोदावरीत आणून ते पाईपलाईने मराठवाड्यात वितरित करण्याची योजना आहे.गेल्या पाचवर्षात १८६ पाणी योजनांची कामे पूर्ण केली असून, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच राष्ट्रीय महामार्ग, समृध्दी महामार्ग आदी विकास कामांमुळे राज्याचा चेहरामोहरा बदलल्याचा दावा फडणवीस यांनी केला.जालन्यात आयसीटी ही प्रतिष्ठित शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जे प्रयत्न केले, त्यामुळे उच्च शिक्षणाची मोठी संधी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी देखील विरोधकांवर टीकेचे प्रहार करून गेल्या पाचवर्षात जितका विकास झाला तितका काँग्रेसने कधीच केला नसल्याचे सांगितले. जालना ते अंबड रस्त्यासाठी आम्ही ३५० कोटी रूपये मंजूर केल्यानेच अपघातांचे प्रमाण कमी होऊन प्रवास गतिमान होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आ. नारायण कुचे यांनी गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अंबडला पाणीपुरवठा योजनाही केली नाही. आम्ही पाचवर्षात चौफेर विकास साधला. या कामी वरिष्ठ नेत्यांची साथ मिळाल्यानेच हे शक्य झाल्याचे कुचे यांनी सांगितले.अंबड : गाडीतूनच हारतुरे स्वीकारल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोडगेवराई येथून मुख्यमंत्री सभा आटोपून अंबडकडे जात होते. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस हे गाडीच्या खाली उतरतील, अशी आशा होती, परंतु ती फोल ठरली. त्यांनी गाडीतून हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले.जे त्यांच्या गाडीजवळ होते, त्यांचा सत्कार त्यांनी घेतला. यामुळे पदाधिकारी, कार्यर्त्यांचा हिरमोड झाला. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किरण खरात, अंबड तालुका उपाध्यक्ष पांडुरंग खरात, सर्कलप्रमुख नजीर शहा, अनिरुद्ध झिंजुर्डे, सय्यद गफूर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीEVM Machineएव्हीएम मशीनMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्रा