शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सत्तेत असताना इव्हीएम विश्वसनीय होते का?- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:55 IST

इव्हीएममध्ये विरोधकांना दोष कसा दिसतो, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अंबड येथे आयोजित जाहीर सभेत केला

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : केंद्रासह महाराष्ट्रात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने दहा वर्षे सत्ता भोगली. त्यावेळच्या निवडणुका या देखील इव्हीएमवरच झाल्या होत्या. त्यामुळे इव्हीएम चांगले होते आणि आता आम्हाला जनता विजयी करत आहे, तर इव्हीएममध्ये विरोधकांना दोष कसा दिसतो, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अंबड येथे आयोजित जाहीर सभेत केला. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा वर्ष आणि आमचे पाच वर्ष या काळातील जो विकास आम्ही केला त्यावर खुली चर्चा झाल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल, असे आव्हानही विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी दिले.अंबड येथील दत्ताजी भाले मैदानावर महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, भाजपाचे उपप्रदेशाध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर, आ. नारायण कुचे, नगराध्यक्षा संगीता कुचे, शीतल कुचे, जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंग ठाकूर, शहराध्यक्ष संदीप खरात, नगरसेवक सौरभ कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आघाडी सरकारने केवळ २० हजार कोटी रूपये देऊ केले होते. ते आम्ही ५० हजार कोटी रूपये दिले. यासह दुष्काळी अनुदान, बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान इ. मदत ही वेगळी असे त्यांनी नमूद केले. मराठवाड्याच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला आहे, तो भविष्यात भूतकाळ होईल, असे सांगून सिंचन, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य मिटविणयसाठी वॉटरग्रीड प्रकल्पासाठी २० हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. तसेच समुद्राचे १६७ टीमएमसी पाणी गोदावरीत आणून ते पाईपलाईने मराठवाड्यात वितरित करण्याची योजना आहे.गेल्या पाचवर्षात १८६ पाणी योजनांची कामे पूर्ण केली असून, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच राष्ट्रीय महामार्ग, समृध्दी महामार्ग आदी विकास कामांमुळे राज्याचा चेहरामोहरा बदलल्याचा दावा फडणवीस यांनी केला.जालन्यात आयसीटी ही प्रतिष्ठित शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जे प्रयत्न केले, त्यामुळे उच्च शिक्षणाची मोठी संधी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी देखील विरोधकांवर टीकेचे प्रहार करून गेल्या पाचवर्षात जितका विकास झाला तितका काँग्रेसने कधीच केला नसल्याचे सांगितले. जालना ते अंबड रस्त्यासाठी आम्ही ३५० कोटी रूपये मंजूर केल्यानेच अपघातांचे प्रमाण कमी होऊन प्रवास गतिमान होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आ. नारायण कुचे यांनी गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अंबडला पाणीपुरवठा योजनाही केली नाही. आम्ही पाचवर्षात चौफेर विकास साधला. या कामी वरिष्ठ नेत्यांची साथ मिळाल्यानेच हे शक्य झाल्याचे कुचे यांनी सांगितले.अंबड : गाडीतूनच हारतुरे स्वीकारल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोडगेवराई येथून मुख्यमंत्री सभा आटोपून अंबडकडे जात होते. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस हे गाडीच्या खाली उतरतील, अशी आशा होती, परंतु ती फोल ठरली. त्यांनी गाडीतून हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले.जे त्यांच्या गाडीजवळ होते, त्यांचा सत्कार त्यांनी घेतला. यामुळे पदाधिकारी, कार्यर्त्यांचा हिरमोड झाला. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किरण खरात, अंबड तालुका उपाध्यक्ष पांडुरंग खरात, सर्कलप्रमुख नजीर शहा, अनिरुद्ध झिंजुर्डे, सय्यद गफूर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीEVM Machineएव्हीएम मशीनMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्रा