शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

वाघोडा ग्रामस्थांचा मंठा तहसीलवर ठिय्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:26 IST

पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले असून अनेक ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे विर अधिग्रहण तसेच टँकर सुरू करण्याची मागणी करूनही प्रशासन यावर काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यात पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले असून अनेक ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे विर अधिग्रहण तसेच टँकर सुरू करण्याची मागणी करूनही प्रशासन यावर काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.वाघोडा गावांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायतने टँकरची मागणी केली होती. प्रशासनाकडून टँकर मंजूर करण्यात आले परंतु टँकरने केवळ चार ते पाच दिवस पाणीपुरवठा करण्यात आला आणि अचानक टँकर बंद झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी उन्हामध्ये भटकंती करण्याची वेळ आली. पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या वाघोडा गावातील महिला आणि पुरुषांनी तहसील कार्यालयामध्ये टँकर पूर्ववत सुरू करण्यासाठी हे आंदोलन केले सादरील त्यांकर त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनीच बंद केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तात्काळ टँकर सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधितांनी यावेळी दिला.या आंदोलनाचे नेतृत्व सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब लोमटे यांनी केले.यावेळी नामदेव शिंदे हे लक्ष्मण घुंगरात, विजय माला लोमटे, सुमनबाई घुंगरात, राधाकिसन लोमटे, रेशमाबाई घुगे, गंगासागर लोमटे, शिवानंद घुमर, कलावती शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वाघोडा या गावांमध्ये बाराही महिने पाणीटंचाई असते. त्यातच आमचे सुरु केलेले त्यानंतर का बंद केले, याचा जाब विचारण्यासाठी गावातील महिला व नागरिक तहसील कार्यालयामध्ये आले होते. उपविभागीय अधिकारी यांनी हेतूपुरस्सर टँकर बंद केल्याने आम्हाला ना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित महिला व पुरुष यांनी केला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईagitationआंदोलनgram panchayatग्राम पंचायत