शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प तुडूंब तरीही ग्रामस्थांना करावी लागतेय पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प तुडूंब भरलेले असतांना अपुरा वीजपुरवठा होत असल्याने राजूरसह पंधरा ...

राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प तुडूंब भरलेले असतांना अपुरा वीजपुरवठा होत असल्याने राजूरसह पंधरा गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी राजूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक अभियंत्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

यावर्षी समाधानकारक पावसामुळे बाणेगाव व चांधई एक्को मध्यम प्रकल्प तुडूंब भरलेले आहेत. दोन्ही प्रकल्पातून राजूरसह चांधई एक्को, राजुरेश्वर मंदिर, चांधई टेपली, बाणेगाव, खामखेडा, चांधई ठोंबरी, जावळेवाडी, लोणगाव, चिंचोली निपाणी आदी पंधरा गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, महावितरण कंपनीकडून एक दिवसाआड आठ तास वीजपुरवठा सुरू ठेवल्या जात असल्याने मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन्ही प्रकल्पापासून सदर गावे सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आठ तासात होणारा पाणीपुरवठा कमी पडत आहे. मुबलक पाणी असतांनाही महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. येत्या सोमवारपासून राजुरेश्वर जन्मोत्सव सोहळा सुरू होणार असल्याने भाविकांच्या गर्दीत वाढ होणार आहे. त्यामुळे भाविकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची शक्यता आहे.

बारा तास सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी

महावितरण कंपनीने चांधई ठोंबरी फिडरमधून दररोज किमान बारा तास सुरळीत वीजपुरवठा केल्यास पाणी समस्येची तीव्रता कमी होऊ शकते. त्यासाठी बारा तास सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच भाऊसाहेब भुजंग, ग्रामविकास अधिकारी जगन खैरे, माजी सरपंच मुसा सौदागर, विनोद डवले, रामेश्वर सोनवणे, आप्पासाहेब पुंगळे, निवृत्ती पुंगळे, राहुल दरक, संतोष मगरे, शिवाजी जगताप, दादाराव मगरे, बबन मगरे, विष्णू राज्यकर, कृष्णा जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.