शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

"लेकरं लेकरं करतो, मग इकडं काय बकरं आहेत का?"; जरांगेंवर जोरदार प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 18:51 IST

आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण देऊ नये.

जालना/मुंबई - जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्वच ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तीक टीका केली. छगन भुजबळ यांनी त्यांचं शिक्षण किती आणि त्यांना समजावायला न्यायमूर्ती जातात, असे म्हणत तो पाचवी तरी शिकलाय का, असा सवाल केला. तसेच, हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सारसऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. 

आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण देऊ नये. ५६ मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला नाही. मात्र आम्ही कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत, असे भुजबळ यांनी म्हटले. तर, विजय वडेट्टीवार यांनी अंबड येथील सभेतून ओबीसी समाजाची परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी, जरांगे यांच्यावर जोरदार प्रहार केला. सारखं, लेकरं.. लेकरं.. करतो मग इकडं काय बकरं आहेत का, कापायला? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. तसेच, काहीजण म्हणतात आमच्याकडे जमिनी उरल्या नाहीत. मराठा २० एकरवरुन ५ एकरवर आलाय. मग, ज्यांच्याकडे जमिनीच नाहीत, जे भूमीहीन आहेत, त्यांचं काय?, त्यांनी कसं जगायचं?, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी अंबड येथील सभेतून केला आहे. 

दरम्यान, आता जरांगे पाटलांनी सांगलीतील सभा संपताच छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिले. छगन भुजबळ हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पाटलांनी केला आहे. तसेच, यापुढे आपण त्यांना किंमतच देणार नाही. राजकीय नेत्यांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठा आणि ओबीसी यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले. मात्र, छगन भुजबळ हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे षडयंत्र यशस्वी होणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले. 

भुजबळांवर जरांगेंचा पलटवार

छगन भुजबळ हे माझ्यावर वैयक्तिक टीका करत असून ते खालच्या पातळीवरच राजकारण करत आहेत. माझ्यावर टीका करण्या अगोदर तुम्ही पैसे खावून, जेल भोगून आला आहात याची आठवण तुम्हाला असू दे, असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील ५० टक्के आहोत. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, त्यामुळे मराठा बांधवांनी सुध्दा एक डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण