शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

सत्ताधाऱ्यांच्या जिल्ह्यात रिक्त पदांचे ग्रहण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:39 IST

वर्ग एक, वर्ग दोन आणि वर्ग तीनची शेकडो पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री तसेच राज्याच्या मंत्री मंडळात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री असा सत्ताधाऱ्यांचा जिल्हा म्हणून राज्यात जालन्याची ओळख आहे. असे असताना वर्ग एक, वर्ग दोन आणि वर्ग तीनची शेकडो पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. कोट्यवधी रूपये उपलब्ध होऊनही ती योग्य त्या कामांवर खर्च होताना दिसत नसून, अनेक कामांचा दर्जा हा ढिसाळ असल्याचे दिसून येत आहे.जालना शहर एक व्यापार आणि उद्योगनगरी म्हणून प्रसिध्द आहे. परंतु गेल्या काही वर्षात प्रशासकीय निष्काळजीपणामुळे येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून, शहरातील पाणी, रस्ते, पथदिव्यांची अवस्था बिकट होण्यामागे पालिकेतील अपुरा कर्मचारी वर्गही याला कारणीभूत आहे.वर्षभरापूर्वीच नागपूर येथील एका खासगी कंपनीला शहरातील एलईडी लाईट बसवण्याचे काम दिले होते. त्या कंपनीने प्रारंभी चांगले कामही केले मात्र, नंतर पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. आज अनेक भागातील प्रमुख रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, बांधकाम विभाग, नगर पालिका, जिल्हा परिषद, कृषी विभाग आदी प्रमुख विभागातील वर्ग एक आणि वर्ग दोनची पदे रिक्त आहेत. त्यातच नागरिकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि जलदगतीने कामे व्हावित ही इच्छा असल्याने आहेत त्या कर्मचा-यांची मोठी दमछाक होत आहे.जिल्ह्यातील प्रमुख विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांची माहिती अशी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय (वर्ग-१-५, वर्ग-२-६), जि.प. जालना (वर्ग-१-३९, वर्ग-२- ५२), गटविकास अधिकारी कार्यालय (वर्ग-१-२, वर्ग-२- ३), नगर रचना विभाग (वर्ग-१-१, वर्ग-२- १), कोषागार कार्यालय (वर्ग-१-१, वर्ग-२-१), राज्य उत्पादन शुल्क (एकूण ३), जिल्हा भूमिअभिलेख (६), भूजल सर्व्हेक्षण (२), मत्स्य व्यवसाय (१), जिल्हा दुग्ध व्यवसाय (२), जीवन प्राधिकरण (३), जिल्हा उद्योग केंद्र (२), जिल्हा जलसंधारण विभाग (३१) यासह अन्य विभागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत.सत्ताधा-यांनी लक्ष देण्याची गरजजालना जिल्ह्यात विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे जालन्यात येण्यास तयार नाहीत. तर आहे त्या अधिका-यांमधील बहुतांश जणांनी आपल्याला जालना नको, असे वरिष्ठांकडे बदलीसाठी प्रस्ताव पाठविले आहेत. ही बाब जिल्ह्याच्या विकासासाठी मारक असून, केंद्रीय राज्यमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यात लक्ष घालण्याची नितांत गरज आहे.जिल्ह्यात एकूण वर्ग १ ची मंजूर पदे २०६ असून ५४ रिक्त पदे आहेत. तर वर्ग २ ची एकूण मंजूर पदे २६८ असून रिक्त पदांची संख्या ही ११२ आहे. वर्ग १ आणि वर्ग २ मिळून जिल्ह्यात १६८ पदे रिक्त आहेत.अप-डाऊनची डोकेदुखीजालना शहरातील पाणी टंचाई, शिक्षणाच्या पाहिजे तेवढ्या संधी नसणे, मनोरंजनाच्या साधनांची वानवा, अपुरी रोजगार संधी यासह अन्य बाबींमुळे विविध विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे औरंगाबाद येथून ये-जा करीत असल्याने जालन्याचे कार्यालय ही रेल्वेच्या वेळापत्रकावर चालतात, हे वास्तव नाकारून चालणार नाही.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदcivic issueनागरी समस्याEmployeeकर्मचारी