शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाणी जपून वापरा, जालना जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ ३५ टक्के पाणीसाठा

By विजय मुंडे  | Updated: April 4, 2023 16:37 IST

टंचाई निवारणार्थ सहा कोटींचा आराखडा; मध्यम प्रकल्पांमध्ये ४० टक्के उपयुक्त साठा

जालना : जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांमध्ये ३५.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यात मध्यम प्रकल्पात ४० टक्के तर लघू प्रकल्पांत ३५.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. संभाव्य पाणीटंचाई पाहता जिल्हा प्रशासनाकडून सहा कोटी ४४ लाखांचा टंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे.

गतवर्षी मुबलक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प व ५७ लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. नंतरच्या काळात शेतीसह ग्रामीण भाग, शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्पांतून पाण्याचा उपसा झाला आहे. यंदा फेब्रुवारी, मार्च या महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक जाणवली नाही; परंतु, एप्रिलच्या प्रारंभी उन्हाचा पारा ३६ अंशाच्या वर गेला आहे. उन्हाच्या वाढत्या झळा आणि प्रकल्पांतील कमी होणारा पाणीसाठा पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने एप्रिल ते जून या कालावधीतील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. ५१४ गावे आणि दोन वाड्यांसाठी ५१५ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यासाठी सहा कोटी ४४ लाख रुपये अंदाजित खर्च लागणार आहे.

यात जालना तालुक्यातील १५५ गावांसाठी एक कोटी ६८ लाख ६६ हजार, बदनापूर तालुक्यातील ६७ गावांसाठी ९४ लाख ५६ हजार, अंबड तालुक्यातील १५ गावे, दोन वाड्यांसाठी ५७ लाख १२ हजार, घनसावंगी तालुक्यातील ५० गावांसाठी ९१ लाख रुपये, मंठा तालुक्यातील ५४ गावांसाठी ५६ लाख ५२ हजार, भोकरदन तालुक्यातील १११ गावांसाठी ९६ लाख तर जाफराबाद तालुक्यातील ६२ गावांसाठी ७९.३२ लाख रुपयांचा संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.

११ प्रकल्पात मृत पाणीसाठाजिल्ह्यातील ११ प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे. १९ प्रकल्पांत २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणी आहे. १९ प्रकल्पांत २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्तसाठा आहे. तर केवळ १४ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती: प्रकल्प उपयुक्तसाठाकल्याण गिरिजा- ६६.३९%कल्याण मध्यम - ७३.३२%अपर दुधना - ५९.६७%जुई मध्यम - १७.०८%धामना मध्यम- २५.३८%जिवरेखा मध्यम - ३१.१६%गल्हाटी मध्यम ००.००%

टॅग्स :WaterपाणीJalanaजालनाdroughtदुष्काळ