शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"शेतकऱ्यांना तातडीने मदत करा..."; मनोज जरांगे यांचा शेतातून थेट कृषिमंत्री मुंडेंना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 19:05 IST

मनोज जरांगे यांच्याकडून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी 

वडीगोद्री ( जालना) : मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी सूरु आहे. घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव या गावांमध्ये  दुपारी त्यांनी पाहणी केली. थेट चिखलामध्ये जात जरांगे यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहून जरांगे यांनी थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती केली. 

पुणे आणि माणगाव येथील दौरा करून मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे आज आगमन झाले. जरांगे यांनी लागलीच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जरांगे यांनी पाहणी दौरा सुरू केला आहे. बांधावर न जाता थेट गुटघाभर चिखलात जाऊन त्यांनी पाहणी केली. आज जितकं शक्य होईल तितकं शेतकऱ्यांच झालेल नुकसान बघणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पाहून जरांगे यांनी थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका शेतामधूनच फोन केला. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती त्यांनी यावेळी कृषिमंत्र्यांकडे केली. कृषिमंत्री मुंडे यांनी देखील सरसकट शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचा आश्वासन दिल्याचे जरांगे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनो, काळजी करू नका"शेतकऱ्यांची सहनशीलता सरकारने पाहू नये. माझ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वेदना आहेत, त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पण काळजी करू नका, नुकसान भरपाई यांच्या छाताडावर बसून घेणार आहे." असे आश्वासन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना धीर देताना ते म्हणाले की, "आज जितके शक्य आहे, तितके मी फिरणार आहे. मी राजकारणी नाही की दौरा लिहून घेईन, जे रस्त्यात दिसेल त्या नुकसानीची मी पाहणी करणार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळवणार."

टॅग्स :JalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडे